शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बालमजुरांना कामावर नेणाऱ्या चौघांना अटक : आरपीएफची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:05 IST

बालमजुरी प्रकरणामध्ये चार आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. टीटीईच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.

ठळक मुद्देटीटीईच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालमजुरी प्रकरणामध्ये चार आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. टीटीईच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.विश्वनाथ सोमरसाव (५१), हिरालाल धरम साव (३४), दशरथ विश्वनाथ सोमरसाव (२५) व संजितकुमार सोहन मिस्त्री (२५) अशी आरोपींची नावे असून पहिले तीन आरोपी हिरोडी, झारखंड तर, चौथा आरोपी बंदीचक, नवादा, बिहार येथील रहिवासी आहे. ते सात अल्पवयीन मुलांना मजुरी करण्यासाठी हटिया-पुणे एक्स्प्रेसने सोबत घेऊन जात होते. ही रेल्वेगाडी गोंदिया येथून सुटल्यानंतर टीटीई कर्णसिंह पाटले, कल्लू मिना व सुशीलकुमार यांना आरोपींवर संशय आला. त्यामुळे त्यांनी मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमला याची माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी रेल्वे चाईल्ड लाईन प्रतिनिधी गौरी शास्त्री-देशपांडे व अन्य जवानांसोबत दुपारी १२.३० वाजता आठव्या फलाटावर पोहोचून आरोपींना अल्पवयीन मुलांसह रेल्वेतून खाली उतरवले. सखोल विचारपूस केली असता आरोपींनी मुलांना मजुरी करण्यासाठी मुंबईला घेऊन जात होतो असे सांगितले. मुलांनीही त्याला दुजोरा दिला. आरोपींनी मुलांच्या पालकांना १५०० ते ३००० रुपये महिना वेतन देण्याचे आमिष दाखवले होते. पुढील चौकशीमध्ये मुलांना मुंबईला नाही तर, भुसावळ येथे नेण्यात येत होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांना बाल संरक्षणगृहात पाठविण्यात आले.आरपीएफ कमांडंट ज्योतीकुमार सतिजा व दपूम रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील अधिकाऱ्यांसह उपनिरीक्षक एस. पी. सिंह, एस. एस. बघेल, प्रधान आरक्षक दिनेश सिंह, सुशील मलिक, प्रकाश रायसेडाम, अरविंद टेंभुर्णीकर, आरक्षक विकास शर्मा, विवेक कनोजिया, विनोद राठोड, ईशांत दीक्षित व पी. एल. पटेल यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :railwayरेल्वेArrestअटक