शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बालमजुरांना कामावर नेणाऱ्या चौघांना अटक : आरपीएफची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:05 IST

बालमजुरी प्रकरणामध्ये चार आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. टीटीईच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.

ठळक मुद्देटीटीईच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालमजुरी प्रकरणामध्ये चार आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. टीटीईच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.विश्वनाथ सोमरसाव (५१), हिरालाल धरम साव (३४), दशरथ विश्वनाथ सोमरसाव (२५) व संजितकुमार सोहन मिस्त्री (२५) अशी आरोपींची नावे असून पहिले तीन आरोपी हिरोडी, झारखंड तर, चौथा आरोपी बंदीचक, नवादा, बिहार येथील रहिवासी आहे. ते सात अल्पवयीन मुलांना मजुरी करण्यासाठी हटिया-पुणे एक्स्प्रेसने सोबत घेऊन जात होते. ही रेल्वेगाडी गोंदिया येथून सुटल्यानंतर टीटीई कर्णसिंह पाटले, कल्लू मिना व सुशीलकुमार यांना आरोपींवर संशय आला. त्यामुळे त्यांनी मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमला याची माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी रेल्वे चाईल्ड लाईन प्रतिनिधी गौरी शास्त्री-देशपांडे व अन्य जवानांसोबत दुपारी १२.३० वाजता आठव्या फलाटावर पोहोचून आरोपींना अल्पवयीन मुलांसह रेल्वेतून खाली उतरवले. सखोल विचारपूस केली असता आरोपींनी मुलांना मजुरी करण्यासाठी मुंबईला घेऊन जात होतो असे सांगितले. मुलांनीही त्याला दुजोरा दिला. आरोपींनी मुलांच्या पालकांना १५०० ते ३००० रुपये महिना वेतन देण्याचे आमिष दाखवले होते. पुढील चौकशीमध्ये मुलांना मुंबईला नाही तर, भुसावळ येथे नेण्यात येत होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांना बाल संरक्षणगृहात पाठविण्यात आले.आरपीएफ कमांडंट ज्योतीकुमार सतिजा व दपूम रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील अधिकाऱ्यांसह उपनिरीक्षक एस. पी. सिंह, एस. एस. बघेल, प्रधान आरक्षक दिनेश सिंह, सुशील मलिक, प्रकाश रायसेडाम, अरविंद टेंभुर्णीकर, आरक्षक विकास शर्मा, विवेक कनोजिया, विनोद राठोड, ईशांत दीक्षित व पी. एल. पटेल यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :railwayरेल्वेArrestअटक