शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

फडणवीसांच्या भाग्यात 'माजी' शब्द अल्पायू : भैयाजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 21:37 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री हा शब्द अल्पायू असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसाधना सहकारी बँकेच्या नवनिर्मित भवनाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री हा शब्द अल्पायू असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेले जोशी यांचे वक्तव्य काही वेगळे संकेत देणारे तर नाही ना, अशी शंका उपस्थित झाली आहे.साधना सहकारी बँकेच्या जरीपटका येथील २२ हजार चौरस फूट जागेतील नवनिर्मित भवनाचे लोकार्पण भैयाजी जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरिता फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बँकेचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा, मनपा आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, बँकेचे माजी अध्यक्ष आवतराम चावला, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनोद लालवानी, बँकेचे पदाधिकारी व संचालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्व. अर्जुनदास कुकरेजा आणि स्व. माजी आ. गंगाधरराव फडणवीस यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण भैयाजी जोशी आणि सरिता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.जोशी म्हणाले, लोकशाही देशाची मोठी शक्ती आहे. मताचा अधिकार सर्वोच्च आहे. लोकशाहीची ताकद लोकांमध्ये आहे. संविधानाने अधिकार मिळाले, पण अधिकार काय आहेत हे अधोरेखित झाले नाही. ७० वर्षांत कर्तव्याची जागृती आली नाही. केवळ कर्तव्याचा भाव आहे. बँकेच्या संदर्भात ते म्हणाले, सहकारितेचा भाव सक्षम राहिला पाहिजे. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास विकास होईलच. बँकेला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजेच पाया मजबूत आहे. इमारत चार मजली असल्याने चारपट विकास होणार आहे. अर्थ क्षेत्रात काम करणे तसे कठीण आहे. फळाची आशा जिथे असते, तिथे साधना नसते. बँकेचा ग्राहक महत्त्वपूर्ण आहे. अर्थसोबत खेळणारे लोक नि:स्वार्थ असल्यास तिथे परमार्थ होतो. संकल्प घेऊन बँकेचे काम सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.वारिस पठाणवर सरकारने कारवाई करावी : जोशीवारिस पठाणच्या वक्तव्याचा निषेध करताना भैयाजी जोशी म्हणाले, हिंदुस्थान सहिष्णू देश आहे. मुस्लीम देशात असे बोलले असते तर खपवून घेतले असते काय? वारिस पठाणवर सरकारने कठोर कारवाई करावी.वारिस पठाण यांचे वक्तव्य निंदनीय : देवेंद्र फडणवीसदेशात १०० कोटी हिंदू आहेत. म्हणूनच त्यांना येथे बोलण्याचा अधिकार आहे. एखाद्या मुस्लीम देशात असे बोलले असते तर काय अवस्था झाली असती? या देशातील हिंदू सहिष्णू आहे. याचा अर्थ कमजोर आहेत असा नाही. वारिस पठाण यांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यांनी माफी मागावी, अन्यथा सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.फडणवीस म्हणाले, सर्वांनी मिळून बँक सुरू केली तेव्हा व्यापार नव्हे तर समाजसेवा ही भावना होती. बँकेने समाजाला पुढे नेले आहे. समाजाच्या प्रगतीत छोट्या बँकांचे मोठे योगदान आहे. ही बँक विश्वासाने प्रगती करीत आहे. अर्जुनदास आणि गंगाधरराव हे दोघे मित्र होते. त्यांचे काम हेच स्मारक आहे. बँक भविष्यात प्रगती करेल, असा विश्वास आहे.सरिता फडणवीस म्हणाल्या, अर्जुनदास आणि गंगाधरराव यांच्यातील मैत्रीनेच बँकेचे अवघड स्वप्न साकार झाले. हा वेल असाच फुलत राहो. सभासद आणि ग्राहकांच्या योगदानाने बँकेची प्रगती होईल. घनश्याम कुकरेजा यांनी बँकेच्या स्थापनेपासून आजतागायत झालेल्या प्रगतीची माहिती दिली. ते म्हणाले, संचालक आणि ग्राहकांच्या सहकार्याने बँक मोठी झाली आहे.याप्रसंगी भवनाच्या निर्मितीत हातभार लागलेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbankबँक