शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

मनुष्यबळ देण्याचा पडला विसर

By admin | Updated: March 29, 2016 03:52 IST

दीड लाख लोकांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित शांतिनगर पोलीस ठाण्याला मंजूर

नरेश डोंगरे ल्ल नागपूरदीड लाख लोकांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित शांतिनगर पोलीस ठाण्याला मंजूर केलेले मनुष्यबळ देण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. १०३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संख्याबळ मंजूर करून सुरू करण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यात केवळ ३ अधिकारी आणि १२ कर्मचारीच प्रत्यक्षात काम करीत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अनेक खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी वसुलीसह विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या वसीम चिऱ्या तसेच तिरुपती भोगे या खतरनाक गुंडांच्या टोळ्या शांतिनगरात कार्यरत आहेत. त्यांच्यासह अनेक गुन्हेगार या भागात दारू, गांजा, अफू, चरस, गर्द, जुगार अड्डे, मटका अड्डे आणि क्लब या भागात चालतात. बुकीही हायटेक अड्डे उघडून बसले आहेत. या भागात नेहमीच गंभीर गुन्हे होत असतात. तातडीने पोलीस पोहोचत नसल्यामुळे लकडगंज पोलीस ठाण्याचे विभाजन करून शांतिनगर पोलीस ठाणे कार्यान्वित करावे, अशी आग्रही मागणी या भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी उचलून धरली. तसा प्रस्ताव १७ मार्च २००८ ला पोलीस आयुक्तालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला २०१० मध्ये शासनाची मंजुरी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी वसीम चिऱ्या आणि तिरुपती भोगे या खतरनाक गुन्हेगारांनी एकमेकांच्या टोळ्यांवर भररस्त्यावर तब्बल तासभर सिनेस्टाईल गोळीबार करून थरार निर्माण केल्यामुळे शांतिनगर ठाण्याला अस्तित्वात आणण्याचे जोरात प्रयत्न सुरू झाले. रविवारी २७ मार्चला शांतिनगर ठाणे कार्यान्वित करण्याचे निश्चित झाले. गल्लत झाली...४नव्या पोलीस ठाण्याची नवी इमारत, प्रशस्त जागा आणि संगणक, वाहने अशा साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एक ठाणेदार, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, नऊ उपनिरीक्षक, सात फौजदार, २२ हवालदार आणि ६० पोलीस नायक-शिपाई असे एकूण १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संख्याबळही ठाण्यात पाठविण्याचे ठरले. पोलीस ठाणे सुरू होण्याच्या किमान पाच दिवसांपूर्वी हे संख्याबळ ठाण्यात रुजू व्हायला हवे होते, मात्र गल्लत झाली. पोलीस ठाणे सुरू होऊन दोन दिवस झाले. परंतु येथे ठाणेदार, दोन उपनिरीक्षक आणि दोन महिलांसह १२ पोलीस कर्मचारी असे एकूण १५ जणच ‘डे-नाईट’ काम करीत आहेत. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेतून बदलीवर पाठविण्यात आलेल्या १५ पैकी १० कर्मचारीच येथे रुजू झाले आहेत.घटनास्थळावर कोण जाणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाचा समारंभ धूमधडाक्यात पार पडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रविवारी सायंकाळपासून आपली गाऱ्हाणी, तक्रारी घेऊन येण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी चालवली आहे. मात्र संख्याबळ लक्षात घेता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याऐवजी समुपदेशनावर भर देणे सुरू केले आहे. त्यामुळे रविवारी तीन आणि आज दिवसभरात चार तक्रारी ‘एनसीआर’ करण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री काही ठिकाणी वाद झाल्याचे, तणाव असल्याचेही निरोप आले. मात्र, कर्मचारी अधिकारीच नसल्याने गस्तीची वाहने घटनास्थळी पोहचू शकली नाही.