शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

वीज विभागाला विभाजनाचा पडला विसर!

By admin | Updated: December 23, 2014 00:38 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी)च्या विभाजनाला नऊ वर्षांचा कालावधी झाला. एवढ्या वर्षांचा कालावधी लोटला असताना अजूनही बऱ्याचशा ठिकाणी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ असेच नाव कायम आहे.

अनेक ठिकाणी नाव कायम : अधिकाऱ्यांचेही कायम दुर्लक्षगणेश खवसे - नागपूरमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी)च्या विभाजनाला नऊ वर्षांचा कालावधी झाला. एवढ्या वर्षांचा कालावधी लोटला असताना अजूनही बऱ्याचशा ठिकाणी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ असेच नाव कायम आहे. त्यामुळे वीज मंडळाचे विभाजन झाले की नाही, वीज मंडळ हेच नाव पुन्हा धारण केले का, असे प्रश्न उपस्थित होतात. दुसरीकडे या प्रकाराकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होणे गंभीर बाब आहे. खापरखेडा वीजनिर्मिती केंद्र, शंकरनगर येथील वीज वितरणचे कार्यालय यांचा ठळकपणे उल्लेख करता येईल. यासोबतच नागपूर शहर आणि जिल्ह्यात इतरही ठिकाणी नामकरण कार्यक्रम अद्याप उरकलेला नाही. त्यामुळेच वीज विभाग अद्याप आपले जुने ते सोने सोडणार की नाही, हा प्रश्नच आहे. प्रशासकीय सोयीसाठी कामगारांचा विरोध झुगारून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे ६ जून २००५ मध्ये विभाजन करण्यात आले. यानुसार महावितरण, महानिर्मिती व महापारेषण असे वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आले. यामुळे वीज ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, वीज मंडळाच्या प्रशासकीय कामकाजात बदल झाला असला तरी सेवेचा दर्जा मात्र अद्याप बदललेला नाही. असे असतानाच आणि विभाजनाने फायदा झाल्याचा कांगावा करणाऱ्या महानिर्मिती व महावितरणने जुनेच वीज मंडळ हेच नाव कायम ठेवले आहे. खापरखेडा येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रवेश करताच वीजनिर्मिती होत असलेल्या इमारतीवर ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा’ असे नमूद केल्याचे निदर्शनास येते. परिणामी विद्युत मंडळाचे विभाजन झाल्याचे या केंद्राला माहीत नाही काय, असा प्रश्न साहजिकच पडतो. विशेष म्हणजे स्टीलची कोरीव अक्षरे करून येथे बसविण्यात आली आहे. दुसरे उदाहरण शंकरनगर चौकात असलेल्या महावितरणच्या कार्यालयाचे आहे. या कार्यालयाने अजूनही मोठ्या अक्षरातील ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ हे नाव तसेच ठेवले आहे. हे नाव दर्शनी भागात असून, येथून कितीतरी लोकप्रतिनिधी जातात. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधीसुद्धा दुर्लक्ष करतात. याशिवाय महावितरणच्या अनेक कार्यालयात अजूनही ‘वीज मंडळ’ हे नाव कायम असल्याचे दिसून आले. नामकरण झालेले असताना वीज कर्मचारी, अधिकारी जुने नाव सोडण्यास तयार नाही. अशा अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.