शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

वन सप्ताह; ना निधी आला, ना उद्दिष्ट ठरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:03 IST

१ जुलैपासून राज्यात वन सप्ताह सुरू झाला आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियमित उद्दिष्ट ठरते. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खड्ड्यांची कामे सुरू होतात. मात्र यंदा निधी आला नाही किंवा उद्दिष्टही ठरलेले नाही.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काळात राज्यात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली होती. त्यातून दरवर्षी ३० कोटींवर झाडे लावण्यात आली. मात्र यंदा निधी आलेला नाही किंवा वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठरलेले नाही. एवढेच नाही तर यंदा फक्त ३३ टक्के खर्चाला मंजुरी आहे. झालेले वृक्षारोपण आणि नर्सरींच्या देखभालीच्या कामासाठीच ही रक्कम खर्ची होणार असल्याने यंदाची वृक्षारोपण मोहीम प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.१ जुलैपासून राज्यात वन सप्ताह सुरू झाला आहे. वृक्षारोपणाच्या मोहिमेला याच काळात प्रारंभ होत असतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियमित उद्दिष्ट ठरते. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खड्ड्यांची कामे सुरू होतात. मात्र यंदा निधी आला नाही किंवा उद्दिष्टही ठरलेले नाही. नागपूर विभागात ही परिस्थिती आहे. राज्यातही जवळपास अशीच स्थिती आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये तर मागील वर्षीचा काही निधी मिळणे बाकी आहे.नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील वृक्षारोपणासाठी निधीची मागणी नोंदविली आहे. सहायक मुख्य वनसंरक्षकांकडून बजेट मंजुरीसाठी जाते, नंतर ते सामाजिक वनीकरण विभागाला मिळते. यंदा प्रतीक्षा कायम आहे. सरकारच्या धोरणानुसार यंदा फक्त ३३ टक्के निधी मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नर्सरींच्या देखभालीवर आणि मागील वर्षीच्या वृक्ष लागवडीच्या संगोपनावर हा निधी प्राधान्यक्रमाने खर्च करावा लागणार आहे.नरेगाचा आधारमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वन विभागासाठी मिळणाºया निधीतूनच यंदाच्या वृक्षारोपणाची आखणी अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. वन विभागाकडून फक्त ५० हजार वृक्षांचीच लागवड होणार आहे. त्यामुळे खासगी संस्था, व्यक्ती, मंडळे, ग्रामपंचातयींच्या माध्यमातून वृक्षारोपणावर अधिक भर दिला जाणार आहे.नागपूर विभागात तीन लाख वृक्षांचे नियोजननागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये तीन लाख वृक्षलागवडीचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. सध्यातरी गतवर्षीची मिळून ३१ लाख रोपे उपलब्ध आहेत. २७ लाख रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. नर्सरीतून रोपांची विक्री करण्यासोबतच अन्य विभागांनाही पुरवठा केला जाणार आहे.नव्या योजनेचे परिपत्रक नाहीराज्य सरकारने यंदा वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचे अद्याप परिपत्रकच निघालेले नाही. योजनेचे उद्दिष्टही जाहीर झालेले नाही. १ जुलैपासून वनसप्ताह सुरू झाला असला तरी योजनेच्या घोषणेची प्रतीक्षाच आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार