शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

वन पर्यटन सुरू, मात्र प्रतिसाद कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 20:53 IST

Forest tourism, Less Response, Nagpur Newsबऱ्याच कालावधीनंतर राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले आहे. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वगळता इतर ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. कोरोनामुळे हा परिणाम जाणवत असून दिवाळीनंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बऱ्याच कालावधीनंतर राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले आहे. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वगळता इतर ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. कोरोनामुळे हा परिणाम जाणवत असून दिवाळीनंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात निसर्ग पर्यटनाला प्रारंभ झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात मार्च महिन्यासृून निसर्ग पर्यटन बंद होते. जुलै महिन्यात पर्यटनाला परवानगी मिळाली असली तरी महाराष्ट्रातील वन पर्यटन पावसाळ्य्यात बंद असल्याने ते ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये निसर्ग पर्यटन सुरू होते. ऑक्टोबरमध्ये कोअरमधील पर्यटन सुरू झाल्यापासून तिथे बऱ्यापैकी प्रतिसाद दिसत आहे. पर्यटकांचाही ओघ चांगला असून ही परिस्थिती दिवाळीनंतर अधिक चांगली होईल, असशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केवळ या ठिकाणची स्थिती वगळता अन्य ठिकाणी मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नाही. बोर अभयारण्यातील दोनपैकी एकच गेट उघडण्यात आले आहे. मार्गात नाल्याला पाणी असल्याने अडेगाव गेट अद्यापही बंद आहे. पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला येथेही म्हणावा तसा ओघ दिसत नाही. पेंच प्रकल्पातील खुर्सापार गेटवर पर्यटकांचा प्रतिसाद मात्र बरा आहे.

टिपेश्वर अभयारण्यात कोरोना संक्रमणामुळे अधिक खबरदारी घेतली जात आहे. अन्य ठिकाणी एका जिप्सीमध्ये चार पर्यटकांना सफारी करण्याची परवानगी असली तरी येथे मात्र एका जिप्सीतून दोघांनाच सफारीची परवानगी आहे. त्यामुळे जिप्सीच्या खर्चाचा भुर्दंड पडत असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांमध्ये व्यक्त आहेत आहे.

पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी वाढली आहे. महाराष्ट्राबाहेरील पर्यटकही येण्यास इच्छुक आहेत. त्या तुलनेत विदेशी पर्यटकांकडून यंदा प्रथमच प्रतिसाद कमी जाणवत आहे. चौकशी होत असली तरी बुकिंग करण्याच्या मानिसकतेत पर्यटक नसल्याचा रिसॉर्टचालकांचा अनुभव आहे.

ऑक्टोबर महिना असला तरी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही. कोरोनाच्या संसर्गाची भीती लक्षात घेता आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. दिवाळीनंतर पर्यटनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

- रविकिरण गोवेकर, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प तथा मुख्य वनसंरक्षक.

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन