शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वन अधिकाऱ्यांना खाकीची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: September 9, 2016 03:05 IST

वन विभागाची ‘खाकी’ ही शान आहे. अभिमान आहे. एक रुबाब आहे. शिवाय शिस्तीचे प्रतीक आहे.

‘ड्रेस कोड’ गुंडाळला : शिस्त कोलमडलीजीवन रामावत नागपूरवन विभागाची ‘खाकी’ ही शान आहे. अभिमान आहे. एक रुबाब आहे. शिवाय शिस्तीचे प्रतीक आहे. मात्र वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या ‘खाकी’ गणवेशाचीच ‘अ‍ॅलर्जी’ असल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने पोलिसांच्या धर्तीवर आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी खाकीतील ‘ड्रेस कोड’ तयार केला आहे. तो वनरक्षकापासून तर वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी (आरएफओ) अनिवार्य करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, गणवेश हा शिस्त शिकवितो आणि कोणतीही फौज म्हटले की, शिस्त ही आलीच. त्यानुसार वन अधिकारी व कर्मचारी ही वन विभागाची फौज आहे. त्यामुळेच या सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे अधिकार आणि दर्जा प्रदान करण्यात आला आहे. वन विभागातील वनपालाला (फॉरेस्टर) पोलीस उपनिरीक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला पोलीस निरीक्षकाचा दर्जा दिला गेला आहे. शिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांना आपल्या खाकी वर्दीवर स्टार लावण्याचा मान दिला आहे. मात्र असे असताना वन विभागातील हे अधिकारी व कर्मचारी खाकी गणवेशात का दिसत नाही? असा सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय आहे. येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्यासह सर्वच वरिष्ठ वन अधिकारी बसतात. तसेच झिरो माईल्स येथे नागपूर वनवृत्ताचे मुख्यालय असून, येथेही मुख्य वनसंरक्षकांसह (सीसीएफ) डझनभर वरिष्ठ अधिकारी बसतात. या उपरोक्त या दोन्ही कार्यालयात कधीच वन अधिकारी वा कर्मचारी गणवेशात दिसत नाही. खरं तर गणवेश हा वन विभागाची ओळख आहे. वरिष्ठांची मूक संमती सध्या वन विभागातील परिस्थिती पाहता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या मुजोरीला मुख्यालयातील वरिष्ठांची मूक संमती असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात खुलेआम साध्या गणवेशात वावरताना दिसून येतात. एवढेच नव्हे तर अनेक जण वरिष्ठांसमोर बसून चर्चाही करतात. जाणकारांच्या मते, सर्वप्रथम वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (आरएफओ) वर्दीकडे पाठ फिरविली आहे. वन विभागातील कोणताही आरएफओ हा एखाद्या समारंभाचा अपवाद वगळता कधीच गणवेशात दिसत नाही. विशेष म्हणजे, हा अधिकारीच गणवेश वापरत नसल्याने त्याच्या अधिकारात काम करणारा वनपाल आणि वनरक्षक सुद्धा गणवेश वापरत नाही. यात आरएफओ साहेबच वर्दीत नसल्याने ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही. यातून मागील काही वर्षांत वन विभागातील ‘खाकी’ हरवली की काय? असे चित्र दिसू लागले आहे.