शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वन महोत्सव विशेष : वृक्षारोपण करताना देशी झाडांना द्या प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:46 IST

वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या परिसरात असलेल्या वड, आंबा, चिंच अशा विशाल झाडांकडे कधी निरखून पाहिलेत का? या गर्द हिरव्या झाडांची घनदाट सावली, फांदीफांदीवर असलेले पक्ष्यांचे घरटे, त्यांचा किलबिलाट पाहायला मिळेल. हे चित्र दुर्मिळ वाटते म्हणून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रजातीच्या झाडाचे असो, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमींकडून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याबाबत आग्रह होत आहे. मधल्या काळात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना गुलमोहर, सुबाभूळ किंवा लांब वाढणाऱ्या अशोका आदी वृक्षांच्या लागवडीचे चलन वाढले होते. मात्र काही पर्यावरण प्रेमींच्या मते हे परदेशी वृक्ष शोभिवंत दिसण्याशिवाय फारसे फायदेशीर नाहीत. याबाबत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. निरंकुश खुबाळकर यांनी दिलेली माहिती उपयुक्त अशी आहे.डॉ. खुबाळकर यांच्या मते वृक्षांमध्ये भेदभाव करता येणार नाही. ज्याप्रमाणे माणसे आणि पक्षीही या देशातून त्या देशात मुक्त विहार करीत असतात, त्याप्रमाणे वृक्षांची आदानप्रदान गैर नाही. मात्र देशी प्रजातीच्या वृक्षांचे फायदे अधिक आहेत. आंबा, वड, चिंच, पिंपळ, कडुलिंब हे वृक्ष आकाराने मोठे आणि त्यांचा परीघ अधिक असतो. त्यामुळे दूर दूर अंतरावर लावले तरी छान बहरतात. ही झाडे दाट असल्याने पक्ष्यांची जैवविविधता अधिक वाढते. घनदाट सावली ही कधीही शांतता देणारी असते. शिवाय फळे येत असल्याने माणसांसह प्राणी आणि पक्ष्यांना लाभदायक असतात. मोठे उंबराचे झाड हे याचप्रमाणे फायदेशीर असते. जाड पानांमुळे आॅक्सिजन बाहेर सोडण्याची क्षमता अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे ही झाडे एकदा लावली की वर्षानुवर्षे टिकून राहतात, त्यामुळे पुन्हा पुन्हा वृक्षारोपणाची गरज पडत नाही.याउलट गुलमोहरासारखे वृक्ष फार टिकणारे नसतात. मात्र या झाडांना एकदमच नाकारण्यापेक्षा मधे मधे लागवड करण्यात गैर नाही. उन्हाळ्यात रस्त्याने जाताना पळस फुलांसारखी या झाडांची बहरलेली फुले कधीही आकर्षित करतात. त्यामुळे देशी वृक्षांना प्राधान्य देताना या झाडांचीही निवड आवश्यक असल्याचे मत डॉ. खुबाळकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :forestजंगल