शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वन महोत्सव विशेष : वृक्षारोपण करताना देशी झाडांना द्या प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:46 IST

वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या परिसरात असलेल्या वड, आंबा, चिंच अशा विशाल झाडांकडे कधी निरखून पाहिलेत का? या गर्द हिरव्या झाडांची घनदाट सावली, फांदीफांदीवर असलेले पक्ष्यांचे घरटे, त्यांचा किलबिलाट पाहायला मिळेल. हे चित्र दुर्मिळ वाटते म्हणून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रजातीच्या झाडाचे असो, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमींकडून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याबाबत आग्रह होत आहे. मधल्या काळात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना गुलमोहर, सुबाभूळ किंवा लांब वाढणाऱ्या अशोका आदी वृक्षांच्या लागवडीचे चलन वाढले होते. मात्र काही पर्यावरण प्रेमींच्या मते हे परदेशी वृक्ष शोभिवंत दिसण्याशिवाय फारसे फायदेशीर नाहीत. याबाबत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. निरंकुश खुबाळकर यांनी दिलेली माहिती उपयुक्त अशी आहे.डॉ. खुबाळकर यांच्या मते वृक्षांमध्ये भेदभाव करता येणार नाही. ज्याप्रमाणे माणसे आणि पक्षीही या देशातून त्या देशात मुक्त विहार करीत असतात, त्याप्रमाणे वृक्षांची आदानप्रदान गैर नाही. मात्र देशी प्रजातीच्या वृक्षांचे फायदे अधिक आहेत. आंबा, वड, चिंच, पिंपळ, कडुलिंब हे वृक्ष आकाराने मोठे आणि त्यांचा परीघ अधिक असतो. त्यामुळे दूर दूर अंतरावर लावले तरी छान बहरतात. ही झाडे दाट असल्याने पक्ष्यांची जैवविविधता अधिक वाढते. घनदाट सावली ही कधीही शांतता देणारी असते. शिवाय फळे येत असल्याने माणसांसह प्राणी आणि पक्ष्यांना लाभदायक असतात. मोठे उंबराचे झाड हे याचप्रमाणे फायदेशीर असते. जाड पानांमुळे आॅक्सिजन बाहेर सोडण्याची क्षमता अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे ही झाडे एकदा लावली की वर्षानुवर्षे टिकून राहतात, त्यामुळे पुन्हा पुन्हा वृक्षारोपणाची गरज पडत नाही.याउलट गुलमोहरासारखे वृक्ष फार टिकणारे नसतात. मात्र या झाडांना एकदमच नाकारण्यापेक्षा मधे मधे लागवड करण्यात गैर नाही. उन्हाळ्यात रस्त्याने जाताना पळस फुलांसारखी या झाडांची बहरलेली फुले कधीही आकर्षित करतात. त्यामुळे देशी वृक्षांना प्राधान्य देताना या झाडांचीही निवड आवश्यक असल्याचे मत डॉ. खुबाळकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :forestजंगल