शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शिव पीक रक्षण योजनेसाठी वन विभागाचा १०० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST

नागपूर : वनव्याप्त आणि जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वन विभाग शिव पीक रक्षण योजना अस्तित्वात आणत आहे. यासाठी १०० ...

नागपूर : वनव्याप्त आणि जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वन विभाग शिव पीक रक्षण योजना अस्तित्वात आणत आहे. यासाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे टाकला जाणार असून १ हजार कोटी रुपयांची ही योजना प्रस्तावित आहे. ही सौर ऊर्जा कुंपण योजना असून शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदानावर लाभ देण्याचे या योजनेत प्रस्तावित आहे.

राज्यात वेगवेगळ्या भागातील पीक पद्धत आणि अडचणी वेगळ्या आहेत. विदर्भात वन्यप्राण्यांचा शेतीला उपसर्ग अधिक आहे. त्यांच्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी वीज तारा सोडतात. यात वाघ, बिबटांसह अन्य वन्यप्राणी मरतात. त्यातून वन विभागासोबत संघर्ष उद्भवतो. शेतकऱ्यांवर कारवाया होतात. पश्चिम महाराष्ट्रात तृणभक्षी प्राणी अधिक आहेत. त्यांचे कळप पीक नष्ट करतात. अन्य भागातही अशाच समस्या आहेत. यावर उपाय म्हणून वन विभागाने ही योजना प्रस्तावित केली आहे. २०१४-१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ही योजना स्थानिक स्तरावर वन विभाग राबवित आहे. या योजनेला अपेक्षित यश आले. जनावरांपासून पीक वाचल्याने उत्पन्न वाढले. वन्यप्राण्यांचे मृत्यू टळले. रात्रीच्या जागली टळल्याने वन्यजीवांच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या. तसेच शेतीच्या नुकसान भरपाईपोटी वन विभागाकडून दिली जाणारी रक्कम वाचली. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोतरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना काही महिन्यांपूर्वी ही योजना समजावून व्यापक स्वरूपात राबविण्याची विनंती केली होती.

...

अशी असेल योजना

या योजनेतून शेतकऱ्यांना सोलर पॅनल, बॅटरी, तार, खांब अशी किट दिली जाईल. १५ हजार रुपयांच्या या संचात ७५ टक्के शासन, २५ टक्के लाभार्थी असा वाटा राहील. योजनेसाठी दरवर्षी अर्ज मागविले जातील. लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीपिकाची नुकसान भरपाई मिळणार नाही. प्रारंभी योजनेसाठी १०० कोटी रुपये वित्त विभागाकडून मागितले जाईल. अन्य योजनांमधूनही यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून दरवर्षी दिली जाणारी कोट्यवधींची रक्कम यामुळे वाचणार आहे.

...

वन्यप्राण्याची हानी होऊ नये, शेतीचे नुकसान टळावे आणि वन्यजीव संघर्ष टळून सामाजिक शांतता कायम राहावी यासाठी शिव पीक रक्षण योजना राज्यभर राबविली जाणार आहे. लवकर मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटसमोर ही योजना ठेवून मंजुरी घेतली जाईल.

- संजय राठोड, वनमंत्री