शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शिव पीक रक्षण योजनेसाठी वन विभागाचा १०० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST

नागपूर : वनव्याप्त आणि जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वन विभाग शिव पीक रक्षण योजना अस्तित्वात आणत आहे. यासाठी १०० ...

नागपूर : वनव्याप्त आणि जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वन विभाग शिव पीक रक्षण योजना अस्तित्वात आणत आहे. यासाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे टाकला जाणार असून १ हजार कोटी रुपयांची ही योजना प्रस्तावित आहे. ही सौर ऊर्जा कुंपण योजना असून शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदानावर लाभ देण्याचे या योजनेत प्रस्तावित आहे.

राज्यात वेगवेगळ्या भागातील पीक पद्धत आणि अडचणी वेगळ्या आहेत. विदर्भात वन्यप्राण्यांचा शेतीला उपसर्ग अधिक आहे. त्यांच्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी वीज तारा सोडतात. यात वाघ, बिबटांसह अन्य वन्यप्राणी मरतात. त्यातून वन विभागासोबत संघर्ष उद्भवतो. शेतकऱ्यांवर कारवाया होतात. पश्चिम महाराष्ट्रात तृणभक्षी प्राणी अधिक आहेत. त्यांचे कळप पीक नष्ट करतात. अन्य भागातही अशाच समस्या आहेत. यावर उपाय म्हणून वन विभागाने ही योजना प्रस्तावित केली आहे. २०१४-१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ही योजना स्थानिक स्तरावर वन विभाग राबवित आहे. या योजनेला अपेक्षित यश आले. जनावरांपासून पीक वाचल्याने उत्पन्न वाढले. वन्यप्राण्यांचे मृत्यू टळले. रात्रीच्या जागली टळल्याने वन्यजीवांच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या. तसेच शेतीच्या नुकसान भरपाईपोटी वन विभागाकडून दिली जाणारी रक्कम वाचली. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोतरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना काही महिन्यांपूर्वी ही योजना समजावून व्यापक स्वरूपात राबविण्याची विनंती केली होती.

...

अशी असेल योजना

या योजनेतून शेतकऱ्यांना सोलर पॅनल, बॅटरी, तार, खांब अशी किट दिली जाईल. १५ हजार रुपयांच्या या संचात ७५ टक्के शासन, २५ टक्के लाभार्थी असा वाटा राहील. योजनेसाठी दरवर्षी अर्ज मागविले जातील. लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीपिकाची नुकसान भरपाई मिळणार नाही. प्रारंभी योजनेसाठी १०० कोटी रुपये वित्त विभागाकडून मागितले जाईल. अन्य योजनांमधूनही यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून दरवर्षी दिली जाणारी कोट्यवधींची रक्कम यामुळे वाचणार आहे.

...

वन्यप्राण्याची हानी होऊ नये, शेतीचे नुकसान टळावे आणि वन्यजीव संघर्ष टळून सामाजिक शांतता कायम राहावी यासाठी शिव पीक रक्षण योजना राज्यभर राबविली जाणार आहे. लवकर मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटसमोर ही योजना ठेवून मंजुरी घेतली जाईल.

- संजय राठोड, वनमंत्री