शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषधांच्या सुरक्षेसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:10 IST

- अन्न व औषध प्रशासनावर मोठी जबाबदारी : वेळोवेळी होते तपासणी नागपूर : जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली ...

- अन्न व औषध प्रशासनावर मोठी जबाबदारी : वेळोवेळी होते तपासणी

नागपूर : जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधांच्या सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. जिल्हा कार्यालयात एकूण मंजूर पदाएवढेच २३ अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक आहेत. अधिकाऱ्यांना अन्न व औषधांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

पौष्टिक आणि शुद्ध अन्न आणि गुणवत्तापूर्ण औषधी मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त लहान-मोठे हॉटेल्स आहेत. ४७०० पेक्षा जास्त औषध दुकाने आहेत. जिल्ह्यातील अन्न विभागाच्या सुरक्षेचा भार १२ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर आणि औषध विभागाच्या सुरक्षेचा भार ११ औषध सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तपासणीसाठी पुरेसे अधिकारी आहेत. कोरोना काळात तपासणी बंद असली तरीही मार्चनंतर तपासणीला वेग येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. याशिवाय अन्न विभागातर्फे वेळोवेळी प्रतिष्ठानांची तपासणी करून निकृष्ठ दर्जाचा माल विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक कमीच आहे. अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पाहता ही संख्या वाढविण्याची गरज आहे. उपलब्ध अधिकाऱ्यांकडून कामे करून घेतली जातात. पण अन्न सुरक्षा अधिकारी असो वा औषध निरीक्षक, प्रत्येक दुकानात जाऊ शकत नाही, ही सत्यस्थिती आहे.

संपूर्ण औषध दुकानांची तपासणी करणे अशक्य

जिल्ह्यात ४७०० पेक्षा जास्त औषधी दुकाने आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी ११ औषध निरीक्षक आहेत. जिल्ह्याचा विचार केल्यास एवढे औषध निरीक्षक कमी पडतात. प्रत्येक दुकानांची तपासणी करणे अशक्य आहे. लोकसंख्येच्या तुलनेत निरीक्षकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

हॉटेल्सची तपासणी कठोर व्हावी

जिल्ह्यात १२ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त लहान मोठे हॉटेल्स आणि अन्य प्रतिष्ठाने आहेत. तेथील अन्न, पाणी आणि स्वच्छता तपासणीे अशक्य आहे. घडणाऱ्या घटना आणि माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येते. प्रत्येक महिन्यात कारवाई करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

कोर्ट कचेऱ्या करण्यातच जातो जास्त वेळ

लोकसंख्येच्या तुलनेत अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षकांची संख्या कमी आहे. त्यातच दर तीन वर्षांनी त्यांच्या बदल्या होता. अन्य जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षक येतो. कोर्टातील कामांचा निपटारा करण्यासाठी अन्न व औषध विभागाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक खटल्यासाठी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागते. त्यामुळे कामाचा ताण वाढतो.

कामाच्या तुलनेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या योग्य आहे. पण त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. अन्न विभागाने स्वतंत्र अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. सर्वांना दर्जेदार अन्न पदार्थ मिळावे म्हणून विभागातर्फे वेळोवेळी विशेष मोहिम राबविण्यात येते. प्रतिबंधात्मक अन्न पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सणासुदीत विशेष मोहीम राबविण्यावर विभागाचा भर असतो.

शरद कोलते, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध विभाग.

आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त

जिल्ह्यात हॉटेल्स ५ हजारांपेक्षा जास्त

अन्न सुरक्षा अधिकारी १२

जिल्ह्यात औषधी दुकाने ४७०० पेक्षा जास्त

औषधी निरीक्षक ११