शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

पारडीतील निर्माणाधीन उड्डाणपूल ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 8:46 PM

पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर पसरली माती : पावसात अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.पारडी चौकात २४ तास जड वाहनांची वर्दळ असते. पारडी उड्डाणपुलाचे व सोबत मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे या रस्त्याने वाहन चालकांसह पायी जाणाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. दर दिवशी अपघात होत असतात. लोकमतने येथील समस्या अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका या दोघांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.या ठिकाणी सुरक्षा मानकाकडे अजिबात लक्ष देण्यात आलेले नाही. हनुमान मंदिरसमोरच्या रस्त्यावर उड्डाणपुलाचा उतार आहे. तेथील रस्ता सहा महिन्यापासून खोदून तसाच सोडलेला आहे. यात आतापर्यंत सहा फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे. १२० मीटर रुंद असलेल्या पारडी चौकाची ओळखच बनलेली आहे. जागोजागी खड्डे, मातीचे ढिगारे, गिट्टी, अर्धवट अवस्थेतील पिल्लर अशी अवस्था आहे. गेल्या सहा वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु आतापर्यंत केवळ ४० टक्केच काम झाले आहे. भंडारा रोड जिथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तेथील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून येथून ये-जा करावी लागत आहे. लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यापर्यंत सर्वच बंद असल्याने नागरिकांना त्रास झाला नाही. परंतु आता सर्व व्यवहार सुरू असल्याने आणि पावसाळा वाढल्याने अडचणी जास्त वाढल्या आहेत. अपघाताचा धोका वाढला आहे.पावसाळ्याने वाढला त्रासपारडी येथील प्रेमचंद मेश्राम यांनी सांगितले की, निर्माणाधीन उड्डाणपुलामुळे मोठा त्रास आहे. यात पावसाळा सुरू झाल्याने हा त्रास आणखीनच वाढला आहे. या जागेतून वाहन घेऊन जाणे मोठ्या जिकिरीचे आहे. थोडेही लक्ष विचलित झाले की, अपघात झालाच म्हणून समजा. या उड्डाणपुलाने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहे. पारडी चौकातून जात असलेल्या नेताजीनगर येथील रामेश्वर शुक्ला यांनी सांगितले की, १२० मीटर रुंद असलेल्या या चौकाची आता ओळखच संपली आहे. रस्त्यावर माती व गिट्टी जमा झाल्याने दुचाकी वाहन चालकांसाठी येथून गाडी चालवणे धोकादायक झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी