शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपराजधानीत शेतकऱ्यांनी आणलेली फुले झाली कचरामोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 11:38 IST

एकीकडे शेतातील उमललेली फुले सुकत चालली आहेत तर दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी परवानगी मिळत नाही. धाडस करून काही शेतकऱ्यांनी त्यांचा माल सीताबर्डीच्या फुलमार्केटमध्ये आणला तेव्हा महापालिका व पोलिसांनी फुलांचे गठ्ठे कचराकुंडीत फेकून दिले.

ठळक मुद्देअनेकांनी उपटून फेकली शेतातील फुलझाडेटाळेबंदीत विक्रेत्यांवरही संकट

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना टाळेबंदीत मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे शेतातील उमललेली फुले सुकत चालली आहेत तर दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी परवानगी मिळत नाही. धाडस करून काही शेतकऱ्यांनी त्यांचा माल सीताबर्डीच्या फुलमार्केटमध्ये आणला तेव्हा महापालिका व पोलिसांनी फुलांचे गठ्ठे कचराकुंडीत फेकून दिले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांनी शेतातील फुलझाडेच उपटून फेकली आहेत. दुसरीकडे मार्केटमधील फुलविक्रेते आर्थिक संकटाला तोंड देत दिवस काढत आहेत.कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि सर्व ठप्प झाले. दरम्यान, तिसरा आणि चौथा लॉकडाऊन होता होता निर्बंधात शिथिलता अली आणि अनेक व्यवसाय सुरू झाले. तेव्हा फुलविक्रीला परवानगी मिळावी म्हणून व्यापारी आणि शेतकरी विनंती करीत आहेत. नागपूर शहराच्या ५० किलोमीटरच्या आसपास अडीच हजारावर शेतकरी फुलांची शेती करतात. गुलाब, जाई, झेंडू आदी फुलांची शेती होते. सकाळी उठून फुले तोडायची आणि ७.३० ते ८ वाजतापर्यंत मार्केटला आणायची, असा दिनक्रम. पण दोन महिन्यांपासून सर्व ठप्प झाले आहे. लॉकडाऊन-४ संपत आलाय आणि पाचवा लागण्याची स्थिती आहे. अशात फूल व्यवसायाची मुभा द्यावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे १५-२० शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सीताबर्डी मार्केटमध्ये फुलांचे गठ्ठे आणले. मात्र पोलीस आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांनी गठ्ठ्यातील सर्व फुले कचराकुंडीत फेकून दिली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवत परतीचा रस्ता धरला. राजू गोरे (खापरी), कपिल काकडे (गिरोला), सुधाकर खोडे (खैरी पन्नासे), प्रदीप सातपुते (पाटणसावंगी), सुनील मांडवकर (जलालखेडा) आदी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. सरकारने एकतर आर्थिक मदत घ्यावी किंवा विक्री तरी करू द्यावी, अशी विवंचना त्यांनी लोकमतशी बोलताना केली.

फुलविक्रेतेही त्रस्तदुसरीकडे फुलांची विक्री करणारे व्यापारीही टाळेबंदीत त्रस्त झाले आहेत. सीताबर्डीच्या फुलविक्रेता संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय इंगळे यांनी विक्रेत्यांची परिस्थिती मांडली. बाजारात १०० व्यापारी फुलांचा व्यवसाय करतात. प्रत्येकाजवळ ५-६ माणसे आहेत. दोन हजार लोकांचा रोजगार फुलविक्रीवर आहे. शिवाय शहरातील ४००० वर फुलविक्रेते या मार्केटच्या भरवशावर आहेत. यातील अनेकांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. पोलीस आणि मनपा कर्मचारी माल उचलून कचºयात फेकून देतात. अशावेळी आम्ही काय करायचे? दोन महिने परिस्थिती सांभाळली पण आता परिस्थिती परीक्षा घेत असून सांभाळणे मुश्कील होत असल्याची भावना इंगळे यांनी व्यक्त केली.फुलविक्रेते आणि मजुरांची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. दोन महिने सांभाळले, आता कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेने नियम लावून आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. आम्ही सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन आपला व्यवसाय करू. परवानगी देत नसेल तर सरकारने विक्रेते व मजुरांना आर्थिक मदत करावी.- दत्तात्रय इंगळे, उपाध्यक्ष, फुलविक्रेता संघ, सीताबर्डी

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस