शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कन्हान नदीत रस्ता करून पाण्याचा प्रवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:28 IST

नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. हा कालवा नदीला लागून आहे. तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीच्या प्रवाहात वेकोलीच्या कंत्राटदाराने ट्रक वाहतुकीसाठी ३० फूट रुंदीचा रस्ता तयार केला. यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला. याचा कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपातळीवर परिणाम झाल्याने शहरातील उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरातील काही भागातील पाणीपुवठ्यावर परिणाम झाला .

ठळक मुद्देवेकोलीच्या कंत्राटदाराची करामातजलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवाहात अडथळामनपाने प्रवाह मोकळा केला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. हा कालवा नदीला लागून आहे. तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीच्या प्रवाहात वेकोलीच्या कंत्राटदाराने ट्रक वाहतुकीसाठी ३० फूट रुंदीचा रस्ता तयार केला. यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला. याचा कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपातळीवर परिणाम झाल्याने शहरातील उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरातील काही भागातील पाणीपुवठ्यावर परिणाम झाला .सिंचन विभागाने नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान जलशुद्धीकरण केद्रासाठी कन्हान नदीच्या प्रवाहात ७५क्यूसेक्स पाणी सोडले होते. ३२ किलोमीटर अंतर पार करून हे पाणी कन्हान जलशुद्धकरण केंद्राच्या इन्टेकवेलमध्ये पोहचणे अपेक्षित होते. परंतु इन्टेकवेलच्या पाण्याची पातळी वाढली नाही. याचा विचार करता महापालिकेच्या जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्तपणे कन्हान नदी परिसराची पाहणी केली. यात तामसवाडी गावाजवळ कन्हान नदीचा प्रवाह बाधित करून वेकोलीच्या कंत्राटदाराने रस्ता निर्माण केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाह थांबला होता. संबंधित कंत्राटदाराने सिल्लेवाडा खाणीत रेती पुरवठ्याचे कंत्राट घेतले आहे. केद्रात पाणी न पोहचल्याने महापालिका प्रशासन सक्रिय झाले होते.तामसवाडी येथील सिंचन विभागाचे कार्यालय एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे रस्ता निर्माण केला आहे. जलप्रदाय विभागाने सिंचन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला रेती उत्खननाची माहिती देण्यात आली. जलप्रदाय विभागाला अवैध रस्ता निर्माण केल्याची माहिती नव्हती.महापालिकेचे अपर आयुक्त राम जोशी यांनी या प्रकरणात वेकोलीचे सहायक महाव्यवस्थापक डी.एम.गोखले यांच्याशी चर्चा केली. तात्काळ रस्ता हटविण्याचे निर्देश देण्यात आले. रेती उत्खननाचा कंत्राटदाराकडे परवाना असल्याचा दावा वेकोलीने केला आहे. तामसवाडी येथे कन्हान नदीत कच्चा रस्ता दोन दिवसाआधी बांधण्यात आला होता. हा रस्ता हटविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली. यामुळे नदीप्रवाह बाधित होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका