शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

तीन महिन्यानंतर होणार 'फिक्स चार्ज'ची वसुली : शासनाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:18 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद आहेत. या संकटाच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यापर्यंत वीज बिलात ‘फिक्स्ड चार्ज’ न वसुलण्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देमहावितरणने जारी केले नाही आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद आहेत. या संकटाच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यापर्यंत वीजबिलात ‘फिक्स्ड चार्ज’ न वसुलण्याचे जाहीर केले आहे. परंतु महावितरणने यासंदर्भात आतापर्यंत कुठलेही आदेश जारी केलेले नाही. त्यामुळे तीन महिन्यासाठी हे शुल्क माफ केले की ते नंतर वसुलण्यात येईल, याबाबत उद्योगांमध्ये संभ्रम आहे.महावितरणचे म्हणणे आहे की, उद्योगांच्या फिक्स चार्जबाबत आतापर्यंत कुठलीही स्पष्ट रूपरेषा ठरलेली नाही. लोकमतने यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे सध्या उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठानांची स्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांना तीन महिन्यापर्यंत दिलासा देत ‘फिक्स चार्ज’ न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर उद्योग बंद असतील तर वीजही कमी जळत असेल, हे स्वाभाविक आहे. फिक्स चार्ज न घेतल्याने उद्योगांवर या काळात भार येणार नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की, तीन महिन्यानंतर हे शुल्क पुन्हा पूर्वीप्रमाणेच वसूल करणे सुरू होईल. तीन महिन्याचा फिक्स चार्जसुद्धा घेतला जाईल, यासाठी लवकरच रूपरेषा तयार करण्यात येईल. या तीन महिन्यातील वसुली किस्तनुसार विना व्याजाने घ्यावी, यावर विचार सुरू आहे.भार आणखी वाढणारतीन महिन्याचे फिक्स चार्ज पुढच्या बिलामध्ये वसूल करण्यात आले तर संकटात सापडलेल्या उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठानांवर आणखी भार वाढेल. तसेही विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना देण्यात येणारे अनुदान मार्च व एप्रिलमध्ये मिळालेले नाही.

टॅग्स :electricityवीजbillबिल