शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

कोरोनाच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यात पाच तालुके रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:26 IST

Nagpur News आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही दिवसांत पुन्हा वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देनागपूर (ग्रा), कामठी, सावनेर, हिंगणा व उमरेडचा समावेश ग्रामीण भागात तपासण्या वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आतापर्यंत स्थिर असलेल्या कोराेनाची संख्या मागील काही दिवसांत पुन्हा वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी आहे. परंतु, ग्रामीण भागातील संख्या वाढू नये म्हणून आणि ती नियंत्रणात राहावी, यासाठी ग्रामीण भागात पुन्हा एकदा तपासण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी असली, तरी काही तालुक्यांतील परिस्थिती मात्र चांगली नाही. येथील पॉझिटिव्हिटी जास्त आहे. अशा तालुक्यांवर प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, हिंगणा व उमरेड तालुक्यांचा समावेश आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्केपेक्षा कमी असावा. हिंगणामध्ये डिसेंबर महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट २०.७ इतका होता. जानेवारीत तो ९.११ इतका आणि फेब्रुवारीमध्येही तो तसाच कायम आहे. कामठीत डिसेंबरला ५.९ टक्के होता. तो जानेवारीत १०.०२ वर आला. कळमेश्वरमध्ये १०.११ वरून ६.५३, काटोल ६.६ करून ५.१, कुही ६.१ वरून २.९६ टक्के झाला. मौद्यात ६.७ वरून ६.५७, नागपूर (ग्रा.) ११.२ वरून १९ टक्के, उमरेड ६.४ वर कायम आहे. नरखेड ५.६ वर कायम आहे. रामटेक ४.४ वरून ५.५८, सावनेर ९.५ वरून १०.५ वर आला आहे. म्हणजेच नागपूर, सावनेर, कामठी, हिंगणा येथे पॉझिटिव्हिटी दर वाढत आहे. तर, राज्याच्या तुलनेत ग्रामीण भागाचा कोरोनाचा मृत्युदर हा २.८४ टक्के म्हणजेच अधिक आहे. यात हिंगणा, कळमेश्वर, नागपूर, नरखेड, रामटेक व उमरेडमध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत. ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. परिणामी, जिल्ह्यात या तालुक्यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा पुन्हा कडक प्रतिबंध

कोरोना वाढू नये म्हणून सुरुवातीला शासनाने अतिशय कडक प्रतिबंध घातले. मध्यंतरी, सर्व व्यवहार सुरळीत झाले. कोरोनाही नियंत्रणात होता. परंतु, मागील काही दिवसांत कोरोनाची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागिरकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्यावी. होम क्वारंटाइन व्हावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना नियंत्रणात राहील, अन्यथा प्रशासनाला पुन्हा कडक प्रतिबंध घालावे लागेल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस