शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी

By admin | Updated: March 30, 2015 02:31 IST

महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत.

खापरखेडा : महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत. यातील २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक १ ने अखंड वीजनिर्मितीचा २०० दिवसांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला. हा अखंड वीजनिर्मितीचा विक्रम आहे. २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक-१ ची ही कामगिरी महानिर्मितीच्या अलिकडच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. यापूर्वी यास वीजनिर्मिती संचाने १२ एप्रिल २००६ ते १२ आॅक्टोबर २००६ या काळात १८२.९७ दिवस अखंड वीजनिर्मितीचा विक्रम नोंदविला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा संच २६ मार्च १९८९ रोजी कार्यान्वयित करण्यात आला असून, त्या संचाला २६ मार्च २०१४ रोजी २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक १ ते ४ या चार संचांनी एकत्रित ३० आॅक्टोबर २०१४ ते ९ जानेवारी २०१५ या काळात ७०.९७ दिवस अखंड वीजनिर्मिती करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम ५०.४५ दिवसांचा होता. तो ९ मे २००७ ते २९ जून २००७ या काळात नोंदविण्यात आला होता. या वीजकेंद्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संच क्रमांक १ ते ४ या संचांनी सलग नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ या दोन महिन्यात १०० टक्के उपलब्धता गाठली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये ०.१६५ मि.लि. प्रति युनिट इतके कमी तेल वापरून नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. यासाठी उपमुख्य अभियंता बाबुराव बागडे यांच्या नेतृत्वातील कर्मचाऱ्यांची फळी सतत वीज निर्मिती संचालन प्रक्रियेत सुधारणा करून संच बंद न होण्याचे प्रमाण कमी करीत आहेत. या केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचा पाचवा संच व्यावसायिकदृष्ट्या १६ एप्रिल २०१२ रोजी कार्यान्वयित करण्यात आला. या संचाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ३२१.१९७ दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली. ही या संचाची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. या संचाने २४ मार्च २०१५ रोजी १२.२३४ दशलक्ष वीज निर्मिती करून विक्रम प्रस्थापित केला. उपमुख्य अभियंता गिरीश कुमरवार व त्यांचे सहकारी या संचाचे संचालन करतात. या यशस्वी वाटचालीसाठी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या नेतृत्वात राजेश राजगडकर, हेमंत रंगारी, शांताराम पौनीकर, सिद्धार्थ तितरे, हिंमत अवचार, दीपक जोशी आदी अभियंत्यांसह सर्व अधिकारी, कामगार, कंत्राटी कामगार व कंत्राटदार प्रयत्नरत आहेत. (प्रतिनिधी)