शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पाच कीटकनाशकावर बंदी, पण आदेश निघणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 22:52 IST

कृषिमंत्र्यांनी पाच कीटकनाशकावर बंदी घालण्याचा आदेश काढला. आठवड्याभरापूर्वी त्यावर सहीही केली. पण अजूनही आदेश निघाला नाही.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांच्या सहीनंतरही सात दिवसांचा कालावधी लोटला : विदर्भात विषबाधेमुळे तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकारी मंत्र्यांचेही ऐकत नसल्याची बाब बुधवारी कृषिमंत्र्याच्या पत्रपरिषदेत अनुभवास आली. कृषिमंत्र्यांनी पाच कीटकनाशकावर बंदी घालण्याचा आदेश काढला. आठवड्याभरापूर्वी त्यावर सहीही केली. पण अजूनही आदेश निघाला नाही. ही बाब जेव्हा कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली, तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करून बंदीचा आदेश काढण्याच्या सूचना केल्या. कीटकनाशकाच्या फवारणीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना विषबाधा झाल्या आहे. तीन शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. याकडे गंभीरतेने घेऊन कृषिमंत्र्यांनी पाच कीटकनाशकावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. पण त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी केली नसल्याचे दिसून आले.गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कीटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ, अकोला जिल्ह्यात विषबाधा झाल्या आहेत. कृषिमंत्र्यांनी परिसरात दौरा केला असता, एका शेतकऱ्याचा मृत्यूही विषबाधेमुळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कीटकनाशकावर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्याचे, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषेद सांगितले. भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती. पत्रपरिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे उपस्थित होते. कृषी संजीवनी योजनेची माहिती देताना बोंडे म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. जवळपास पाच हजार गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. तीन हजार कोटीची त्यासाठी तरतूद केली आहे. योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय अनुदानाची टक्केवारी ५० वरून ७५ टक्के केली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाच हजार कृषिमित्र व कृषिताईची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणही झाले आहे. कृषिमित्राच्या माध्यमातून वातावरणातील बदल, त्याचे होणारे पिकावर परिणाम, पीक पद्धतीमध्ये बदल, कमी पाण्यात कोणते पीक घेता येतील, बहुविध पीक पद्धती, जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याचा काटकसरीने वापर, शेतावर खताची निर्मिती करणे, बियाण्याचे उत्पादन, मार्केटिंग यासंदर्भात शेतकरीशेतकरी गटांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार असल्याने शेतकरी आत्महत्याही कमी होणार असल्याचे बोंडे म्हणाले.एचटीबीटीचा अहवाल गृहखात्यात अडकलामान्यता नसतानाही एचटीबीटीची विक्री छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात झाली आहे. यासंदर्भात कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेत एसआयटीचे गठण झाले होते. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल द्यावे, असे गृहखात्याला लिहिलेही होते. परंतु कृष्णप्रकाश यांची बदली झाली. हा विषय गृहखात्याशी निगडित आहे. त्यामुळे गृहखात्याला विनंती केली आहे. ताबडतोब अधिकारी नेमून अहवाल द्या, असे कृषिमंत्री बोंडे म्हणाले.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी