शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

एकट्या शर्माने नेले पाच जणांना

By admin | Updated: April 8, 2015 02:33 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कच्च्या कैद्यांना दोन फेऱ्यांमध्ये एकट्या गणेश शर्मा याने आपल्या मोटरसायकलवर नेल्याची माहिती आहे.

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कच्च्या कैद्यांना दोन फेऱ्यांमध्ये एकट्या गणेश शर्मा याने आपल्या मोटरसायकलवर नेल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शर्माने या कैद्यांना मंगळवारच्या पहाटे नव्हे तर सोमवारच्या रात्री १ वाजताच्या सुमारास नेले, अशीही आश्चर्यकारक माहिती आहे. सर्वात आधी त्याने बिसनसिंग रामूलाल उईके आणि सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता यांना मोटरसायकलवर बसवून मोमीनपुऱ्याच्या बकरामंडीत सोडून दिले. त्यानंतर त्याने शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर रा. कुतबिशहानगर गिट्टीखदान यांनाही मोटरसायकलवरच बकरामंडीत सोडून दिले. गणेश शर्मा हा ठेंगणा व धष्टपुष्ट बांध्याचा आहे. त्यामुळे त्याला हे शक्य झाले. नवाब खान हा केवळ या कैद्यांना मोबाईल उपलब्ध करून देत होता. (प्रतिनिधी)दोन महिन्यापूर्वीच शिजला कटसूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार कैद्यांच्या पलायनाचा कट दोन महिन्यांपूर्वीच शिजला होता. संघटित गुन्हेगारांचे सिंडीकेट चालवणारा राजा गौसही पळून जाण्याच्या बेतात होता. परंतु त्याला एका पायाने साथच दिली नाही. पलायनात त्याच्या टोळीच्या बिसनसिंग उईके, सत्येंद्र गुप्ता आणि शिबूचा समावेश आहे. हे तिघेही मोक्काचे आरोपी आहेत. छिंदवाड्याच्या बसमधून प्रवासबकरामंडीत पाचही जण एकत्र झाल्यानंतर ते पिवळी नदी भागात गेले. या ठिकाणी एका कैद्याची बहीण राहते. त्याने तिच्याकडून पैसे घेतले आणि हे सर्व जण कोराडी मार्गवरील मानकापूर येथे गेले. मानकापूर पुलाच्या नंतर ते छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून रवाना झाले. सोमवारी पळून गेलेल्या या कैद्यांबाबतची पुसटशी माहिती मंगळवारी कैद्यांमार्फतच काही सुरक्षा रक्षकांना समजली. त्यांनी अधिकाऱ्यांना कळवले. बरॅक ६ मधील कैद्यांची मोजणी करण्यात आली तेव्हा पाच कैदी कमी आढळले. त्याबरोबरच संपूर्ण कारागृह प्रशासन हादरले.डेंटिस्ट कटर वापरलेपलायनाच्या आठवडाभरापासून या कैद्यांनी डेंटिस्ट उपयोगात आणत असलेल्या छोट्या कटरचा वापर केला. या कटरच्या साहाय्याने दातांचा आकार सारखा केला जातो. हे कटर मोबाईलच्या बॅटरीवर सुद्धा चालत असते. या कटरच्या सहाय्याने कैद्यांनी बडी गोलमधील बराक क्रमांक ६ च्या खिडकीचे तीन गज कापले होते. ब्लँकेट तुकड्याचा वापर सिग्नलसारखापळून जाण्याच्या दिवशी सोमवारी त्यांनी शर्मासोबत मोबाईलवर सतत संपर्क ठेवला होता. कोणत्या ठिकाणाहून पळून जायचे यासाठी त्यांनी ब्लँकेटच्या तुकड्याचा ‘सिग्नल’ म्हणून वापर केला. हा तुकडा उंच भिंतीवर फेकण्यात आला होता. हा भाग चुनाभट्टीकडील आहे. नेमका याच ठिकाणाहून शर्माने दोर फेकला. दोराच्या सहाय्याने हे कैदी एकेक करीत भिंत चढून पळण्यात यशस्वी ठरले.