शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

एकट्या शर्माने नेले पाच जणांना

By admin | Updated: April 8, 2015 02:33 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कच्च्या कैद्यांना दोन फेऱ्यांमध्ये एकट्या गणेश शर्मा याने आपल्या मोटरसायकलवर नेल्याची माहिती आहे.

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कच्च्या कैद्यांना दोन फेऱ्यांमध्ये एकट्या गणेश शर्मा याने आपल्या मोटरसायकलवर नेल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शर्माने या कैद्यांना मंगळवारच्या पहाटे नव्हे तर सोमवारच्या रात्री १ वाजताच्या सुमारास नेले, अशीही आश्चर्यकारक माहिती आहे. सर्वात आधी त्याने बिसनसिंग रामूलाल उईके आणि सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता यांना मोटरसायकलवर बसवून मोमीनपुऱ्याच्या बकरामंडीत सोडून दिले. त्यानंतर त्याने शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर रा. कुतबिशहानगर गिट्टीखदान यांनाही मोटरसायकलवरच बकरामंडीत सोडून दिले. गणेश शर्मा हा ठेंगणा व धष्टपुष्ट बांध्याचा आहे. त्यामुळे त्याला हे शक्य झाले. नवाब खान हा केवळ या कैद्यांना मोबाईल उपलब्ध करून देत होता. (प्रतिनिधी)दोन महिन्यापूर्वीच शिजला कटसूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार कैद्यांच्या पलायनाचा कट दोन महिन्यांपूर्वीच शिजला होता. संघटित गुन्हेगारांचे सिंडीकेट चालवणारा राजा गौसही पळून जाण्याच्या बेतात होता. परंतु त्याला एका पायाने साथच दिली नाही. पलायनात त्याच्या टोळीच्या बिसनसिंग उईके, सत्येंद्र गुप्ता आणि शिबूचा समावेश आहे. हे तिघेही मोक्काचे आरोपी आहेत. छिंदवाड्याच्या बसमधून प्रवासबकरामंडीत पाचही जण एकत्र झाल्यानंतर ते पिवळी नदी भागात गेले. या ठिकाणी एका कैद्याची बहीण राहते. त्याने तिच्याकडून पैसे घेतले आणि हे सर्व जण कोराडी मार्गवरील मानकापूर येथे गेले. मानकापूर पुलाच्या नंतर ते छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून रवाना झाले. सोमवारी पळून गेलेल्या या कैद्यांबाबतची पुसटशी माहिती मंगळवारी कैद्यांमार्फतच काही सुरक्षा रक्षकांना समजली. त्यांनी अधिकाऱ्यांना कळवले. बरॅक ६ मधील कैद्यांची मोजणी करण्यात आली तेव्हा पाच कैदी कमी आढळले. त्याबरोबरच संपूर्ण कारागृह प्रशासन हादरले.डेंटिस्ट कटर वापरलेपलायनाच्या आठवडाभरापासून या कैद्यांनी डेंटिस्ट उपयोगात आणत असलेल्या छोट्या कटरचा वापर केला. या कटरच्या साहाय्याने दातांचा आकार सारखा केला जातो. हे कटर मोबाईलच्या बॅटरीवर सुद्धा चालत असते. या कटरच्या सहाय्याने कैद्यांनी बडी गोलमधील बराक क्रमांक ६ च्या खिडकीचे तीन गज कापले होते. ब्लँकेट तुकड्याचा वापर सिग्नलसारखापळून जाण्याच्या दिवशी सोमवारी त्यांनी शर्मासोबत मोबाईलवर सतत संपर्क ठेवला होता. कोणत्या ठिकाणाहून पळून जायचे यासाठी त्यांनी ब्लँकेटच्या तुकड्याचा ‘सिग्नल’ म्हणून वापर केला. हा तुकडा उंच भिंतीवर फेकण्यात आला होता. हा भाग चुनाभट्टीकडील आहे. नेमका याच ठिकाणाहून शर्माने दोर फेकला. दोराच्या सहाय्याने हे कैदी एकेक करीत भिंत चढून पळण्यात यशस्वी ठरले.