शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

महाराष्ट्रात धावतील पाच जोडी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 20:23 IST

Railway Nagpur News मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) आणि नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान ९ ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत पाच जोडी आरक्षित रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बऱ्याच कालावधीनंतर अखेर महाराष्ट्रात रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) आणि नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर दरम्यान ९ ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत पाच जोडी आरक्षित रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या मते ०२१८९ दुरांतो स्पेशल रेल्वेगाडी ‘सीएसटीएम’वरून १० ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत धावणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचेल. ०२१९० दुरांतो स्पेशल ही गाडी ९ ऑक्टोबरपासून नागपूरवरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. इगतपुरी सोडून या गाडीच्या वेळेत आणि थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ०२१०५ ‘सीएसटीएम’-गोंदिया विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून दुसऱ्या दिवशी गोंदियाला पोहोचेल. ०२१०६ सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाडी १० ऑक्टोबरपासून गोंदियावरून सुटून दुसऱ्या दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. ईगतपुरी सोडून या रेल्वेच्या वेळेत आणि थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

मुंबई-पुणे सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून त्याच दिवशी पुण्याला पोहोचेल. ०२१२४ सुपरफास्ट रेल्वेगाडी १० ऑक्टोबरपासून पुण्यारून सुटून त्याच दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. या गाडीची वेळ आणि थांबे पुर्वी सारखेच राहतील. ०२०१५ ‘सीएसटीएम’-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून त्याच दिवशी पुण्याला पोहोचेल. ०२०१६ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून पुण्यावरून सुटून त्याच दिवशी ‘सीएसटीएम’टर्मिनसला पोहोचेल. या गाडीची वेळ आणि थांबे पुर्वीसारखेच राहणार आहेत.

०२११५ ‘सीएसटीएम’-सोलापूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून ‘सीएसटीएम’वरून सुटून दुसऱ्या दिवशी सोलापूरला पोहोचेल. ०२११६ सोलापूर-‘सीएसटीएम’विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरपासून सोलापूरवरून सुटून दुसऱ्या दिवशी ‘सीएसटीएम’ला पोहोचेल. कर्जत, खंडाळा, लोणावळा, मधा, मोहोल, भिगवान सोडून या गाडीची वेळ आणि थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ८ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे