शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

नागपूर जिल्ह्यात पाच नव्या नगर पंचायत व नगर परिषद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:17 PM

पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़

ठळक मुद्देग्रा.पं.ची संख्या वाढणारशासन दरबारी प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी काळात जिल्ह्यातील बेसा-बेलतरोडी आणि पिपळा-बहादुरा या मोठ्या नगर परिषदा निर्मितीचे प्रस्ताव शासनाच्या नगररचना विभागाला जिल्हा परिषदेने पाठविले आहे़ तसेच कोंढाळी, नीलडोह, खापरखेडा या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदांमध्ये करावे, अशा मागणीचा प्रस्ताव पूर्वीच शासनदरबारी पडून आहे़ त्यावर अद्यापही निर्णय झाला नसला तरी, जिल्ह्यात नव्या नगर पंचायत व नगर परिषदेत वाढ होण्याचे संकेत आहे.जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत नगर परिषद आणि नगर पंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यापाठोपाठ ग्रामपंचायतीतही वाढ होत आहे़ मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ७६८ होती़ त्यात एका ग्रामपंचायतीची वाढ होऊन ती संख्या आता ७६९ इतकी झाली़ कुही तालुक्यात हरदोली ग्रामपंचायतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ तसेच पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़भिवापूर तालुक्यातील मोखेबर्डीचाही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने तिची मंजुरी आल्यास ग्रामपंचायतीचा आकडा या वर्षातच ७७० होईल़ तसेच पिपळा-बहादुरा, बेसा-बेलतरोडी, नीलडोह, खापरखेडा या मोठ्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदांच्या हातातून निसटून गेल्यास त्यांना महसुलावर पाणी सोडावे लागण्याची वेळ येणार आहे़ त्याचा थेट फटका शेष फंडाच्या तिजोरीला बसणार आहे़

टॅग्स :Governmentसरकार