शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली ...

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिवेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.

- नीरीच्या टीमने प्रत्येक तलावातून वरच्या स्तराची व खोलातील नमुन्यांची सखोल तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे.

अभ्यासातील महत्त्वपूर्ण बाबी

- सर्व तलावांचे पीएच लेव्हल ६.९ ते ८.५ च्या दरम्यान आहे.

- गढूळपणा ५ ते १०० एनटीयूपर्यंत म्हणजे सामान्यपेक्षा कितीतरी अधिक.

- सल्फेट/नायट्रेट ३६ ते १८६ व ३ ते ४० मिग्रॅ/लिटरच्या रेंजमध्ये.

- सीओडी २५ ते १४० मिग्रॅ/लिटर तर बीओडी ४.६ ते ८० मिग्रॅ/लिटर.

- फुटाळ्यात सीओडी १६ ते ४० मिग्रॅ/लि. व बीओडी ६-२० मिग्रॅ/लि.

- फुटाळ्याचा आम्लपणा २२० ते ३४८ मिग्रॅ/लिटर, गढूळपणा १० एनटीयू. सल्फेट/नायट्रेट ६५ ते ८८ मिग्रॅ/लिटर.

तलावांनुसार स्थिती

- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.

- नाईक तलावात विरघळलेल्या घनपदार्थांचे प्रमाण २००० मिग्रॅ/ली.च्यावर

- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून त्याच्या असण्याने सिवेज वाहत असल्याचे लक्षात येते.

- नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/लि. अत्याधिक धोक्यात.

- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.

- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, क्लोराईड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.

- सर्व तलावांमध्ये मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.