शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विधी विद्यापीठाची पहिल्या वर्षी घोडदौड

By admin | Updated: February 13, 2017 02:32 IST

नागपुरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘एलएलबी’च्या सर्व जागा ‘हाऊसफुल्ल’ नागपूर : नागपुरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदा ‘एलएलबी’च्या सर्व जागा तर ‘हाऊसफुल्ल’ झाल्या. शिवाय मंजूर पदांची भरतीदेखील सुरू झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासंदर्भात विचारणा केली होती. पहिल्या वर्षी किती जागा भरल्या, शुल्क कसे ठरविण्यात आले तसेच पदभरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.न.म.साकरकर यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पहिल्या वर्षी ‘बीएएलएलबी’साठी प्रवेशसंख्या ६० इतकी होती. सर्व जागांवर प्रवेश झाले. शिवाय ‘एलएलएम’ अभ्यासक्रमासाठी ६ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. विद्यापीठासाठी राज्य शासनाने ४२ पदांचा मंजूर दिली होती. यापैकी १३ पदांवर भरती झालेली आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत शासनाने विद्यापीठाला ३ कोटी ३ लाख ८९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत यातील २ कोटी ४८ लाख ७ हजार ४३६ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.(प्रतिनिधी) शुल्क नियमांनुसारच विद्यापीठाच्या शुल्कासंदर्भात प्रशासनाने स्पष्टोक्ती केली आहे. चालू वर्षाचे शुल्क ठरविण्यासाठी कोणतीही नियमन समिती नेमण्यात आली नव्हती. इतर राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शुल्काच्या प्रमाणातच शुल्क ठरविण्यात आले. कार्यकारी परिषद व विद्वत् परिषदेने शुल्क मान्य केले होते, असे विद्यापीठातर्फे माहितीत नमूद करण्यात आले आहे.