शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
6
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
7
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
8
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
9
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
10
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
11
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
12
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
13
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
14
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
15
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
16
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
17
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
18
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
19
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
20
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली

देशात पहिल्यांदाच कृषिदिन थेट बांधावर

By admin | Updated: June 22, 2017 02:18 IST

भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे,

किसान कृतज्ञता पर्व : नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना देणार नैतिक बळ शफी पठाण। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, अशी मोठमोठी विशेषणे शेतकऱ्यांसाठी वापरली जातात. परंतु कायम कर्जाचे ओझे घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्याच्या हितासाठी प ्रत्यक्ष जमिनीवर मात्र कुठलेच ठोस प्रयत्न होत नाहीत. या सततच्या उपेक्षेला कंटाळून शेतकरी रोज मृत्यूचा फास गळयात अडकवत आहे. हे चित्र बदलावे, शेतीपूरक व्यवसायाची माहिती देता यावी व शेती अन् आयुष्याकडे पाहण्याचा शेतकऱ्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, या उद्देशाने येत्या १ जुलै रोजी कृषिदिनी किसान कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात आले असून देशात पहिल्यांदाच थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हा दिवस साजरा केला जाणार आहे. आपल्या देशात फादर्स डे, मदर्स डे, फ्रेण्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे, असे सर्व डे होतात. परंतु शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणाऱ्या कृषिदिनी मात्र सरकारी सोपस्कार आटोपून केवळ तासाभरात हा कार्यक्रम गुंडाळला जातो. आपल्या नावाचा कुठला एक दिवस या देशात साजरा होतोय, हे लाखो शेतकऱ्यांच्या गावीही नसते. म्हणूनच यापुढे हा शेतकऱ्यांच्या हक्काचा दिवस फक्त सरकारी कार्यालयातपुरता मर्यादित न ठेवता या दिवसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे काहीतरी घडावे, या उद्देशाने एकनाथ पवार या कल्पक शिक्षकाच्या संकल्पनेतून तांडा चलो या लोकोत्तर अभियानातंर्गत राज्यभरात किसान कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी राज्यभरातील सेवाभावी संघटनांचे कार्यकर्ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कृषी योजना, कृषी तंत्रज्ञान, कृषीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगाराबाबत माहिती देणार आहेत. सेल्फी विथ फार्मर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी कृतज्ञतेची मूल्ये रुजवण्यासाठी व समाजातील सर्व घटकांना शेतकऱ्यांशी थेट जोडण्यासाठी ‘सेल्फी विथ फार्मर’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतंर्गत शेतात शेतकऱ्याची भेट घेऊन, त्याला कृषिविषयक माहिती देऊन सेल्फी घ्यायची आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून निवडक सेल्फींना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. वसंतराव नाईकांना ही खरी श्रद्धांजली ज्यांच्या नावाने कृषिदिन साजरा होतो ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे, माझे मन मंत्रालयाच्या एसी कार्यालयापेक्षा शेतावर जास्त रमते. परंतु आजची व्यवस्था तसा विचार करताना दिसत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुढच्या कृषिदिनापासून शासनाने हा उपक्रम स्वत:च्या हातात घ्यावा, अशी या उपक्रमात सहभागी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. -एकनाथ पवार , संयोजक, किसान कृतज्ञता पर्व