शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आधी रेल्वेचे जाळे मजबूत करा, मगच बुलेट ट्रेन चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:25 IST

रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.

ठळक मुद्देएम. राघवय्या : २ लाख ७० हजार रिक्त जागा भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले असताना एम. राघवय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये रेल्वेने देशात १६ हजार कोटी नफा मिळविला. हा नफा म्हणजे १३ लाख १६ हजार कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे प्रतिक आहे. परंतु शासनाने रेल्वेची संपत्ती विकून विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याचे धोरण सुरू केले आहे. यात हजारो कामगार काम करीत असलेले कारखाने खासगी कंत्राटदारांच्या हाती सोपविण्यात येत आहेत. स्किल इंडियाच्या नावाखाली केंद्र शासन युवकांमधील स्कील नेस्तनाबूत करण्याचा सपाटा लावत आहे. त्यामुळे शासनाने विदेशी कंपन्यांशी केलेले अ‍ॅग्रिमेंट रद्द करावे, रेल्वे कर्मचाºयांमध्ये विदेशी चलन मिळविण्याची शक्ती असून कारखान्यांमधील उत्पादन वाढवून मालाच्या निर्यातीद्वारे विदेशी चलन मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, नवी पेन्शन योजना लागू करूनये, विदेशी कंपन्यांचे कंत्राट रद्द करावे या मागण्यांवर महिनाभरात कारवाई न केल्यास संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एक दिवस रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केल्यास शासनाला तीन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर, महासचिव डॉ. प्रवीण बाजपेयी, कार्याध्यक्ष डी. भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधाई, संघटन सचिव ई. व्ही. राव, युवा संरक्षक अमित भटनागर, सोलापूरचे विभागीय सचिव आर. विश्वनाथ उपस्थित होते.प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य द्यारेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आठ तास काम करावे असा नियम आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचारी १२ तासांची ड्युटी करीत आहेत. कंत्राटदारांना कामे दिल्यामुळे ते कामगारांचे शोषण करीत असून कॅटरिंगमध्ये प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळत नाही. त्यामुळे राजकीय मागण्यांपेक्षा प्रवाशांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी एम. राघवय्या यांनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन