शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

आधी रेल्वेचे जाळे मजबूत करा, मगच बुलेट ट्रेन चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:25 IST

रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.

ठळक मुद्देएम. राघवय्या : २ लाख ७० हजार रिक्त जागा भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले असताना एम. राघवय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये रेल्वेने देशात १६ हजार कोटी नफा मिळविला. हा नफा म्हणजे १३ लाख १६ हजार कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे प्रतिक आहे. परंतु शासनाने रेल्वेची संपत्ती विकून विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याचे धोरण सुरू केले आहे. यात हजारो कामगार काम करीत असलेले कारखाने खासगी कंत्राटदारांच्या हाती सोपविण्यात येत आहेत. स्किल इंडियाच्या नावाखाली केंद्र शासन युवकांमधील स्कील नेस्तनाबूत करण्याचा सपाटा लावत आहे. त्यामुळे शासनाने विदेशी कंपन्यांशी केलेले अ‍ॅग्रिमेंट रद्द करावे, रेल्वे कर्मचाºयांमध्ये विदेशी चलन मिळविण्याची शक्ती असून कारखान्यांमधील उत्पादन वाढवून मालाच्या निर्यातीद्वारे विदेशी चलन मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, नवी पेन्शन योजना लागू करूनये, विदेशी कंपन्यांचे कंत्राट रद्द करावे या मागण्यांवर महिनाभरात कारवाई न केल्यास संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एक दिवस रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केल्यास शासनाला तीन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर, महासचिव डॉ. प्रवीण बाजपेयी, कार्याध्यक्ष डी. भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधाई, संघटन सचिव ई. व्ही. राव, युवा संरक्षक अमित भटनागर, सोलापूरचे विभागीय सचिव आर. विश्वनाथ उपस्थित होते.प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य द्यारेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आठ तास काम करावे असा नियम आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचारी १२ तासांची ड्युटी करीत आहेत. कंत्राटदारांना कामे दिल्यामुळे ते कामगारांचे शोषण करीत असून कॅटरिंगमध्ये प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळत नाही. त्यामुळे राजकीय मागण्यांपेक्षा प्रवाशांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी एम. राघवय्या यांनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन