शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

पहिला ठोका पूर्वचा!

By admin | Updated: October 18, 2014 02:48 IST

रविवारी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीला प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी पहिला निकाल कुठला जाहीर होणार याबाबत उत्सुकता आहे.

नागपूर : एका तरुणाच्या हत्येनंतर जरीपटक्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला करून तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनावरही दगडफेक केली. जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनीही जोरदार लाठीमार केला. या घटनेमुळे जरीपटक्यात गुरुवारी रात्रीपासून प्रचंड तणाव आहे.पुरुषोत्तम मनोहरलाल बत्रा (वय ३२) असे मृताचे नाव आहे. परश्या बुकी म्हणून तो ओळखला जायचा. जरीपटक्यातील हरदास धरमशाळेजवळ परश्या राहात होता. किशोर नामक एका मित्रासोबत गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास जरीपटक्यातील दयानंद पार्कजवळ परश्या फिरत होता. आरोपी आरिफ ऊर्फ लॉझर्स विनोद इमॅन्युअल आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी परश्यावर हल्ला चढवला. प्रारंभी शस्त्राने मारल्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घातला. या थरारक घटनेच्या वेळी आजूबाजूला मोठ्या संख्येत मंडळी होती. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले. एकाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. बराच वेळपर्यंत परश्या घटनास्थळी तडफडत होता. पोलीस आणि परश्याच्या मित्रांनी नंतर त्याला धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.हत्येनंतर प्रचंड तणाव नागपूर :परश्याच्या हत्येचे वृत्त पसरताच जरीपटक्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. २०० वर लोकांच्या जमावाने आरोपी आरिफच्या मिसाळ लेआऊटमधील घराकडे धाव घेतली. त्याच्या घरासमोरची दुचाकी जाळली. कंपाऊंडचीही तोडफोड केली. काही जणांनी परश्याच्या घराच्या खिडक्यातून आतमध्ये जळते बोळे फेकून त्याचे घर पेटविण्याचा प्रयत्न केला. माहिती कळताच मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, जमावाने पोलिसांवरच तुफान दगडफेक सुरू केली. यामुळे काही पोलिसांना मार बसला. पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे जमाव तेथून वसंतशहा चौकाकडे पळाला.चौघांना अटक, बाल्याचीही चौकशीपरशाची हत्या केल्याच्या आरोपाखाली जरीपटका पोलिसांनी आज सायंकाळी चौघांना अटक केली. आरिफ ऊर्फ लॉझर्स इमॅन्युअल (वय ३६), सुशांत ऊर्फ मोनू रवींद्र गजभिये (वय २५, रा. दोघेही मिसाळ लेआऊट), अमित ऊर्फ जय बल्लू शंभरकर आणि नेहाल ऊर्फ सनी रवी शेलारे (वय २१, रा. दोघेही हुडको कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपी आरिफ ‘बाल्या‘च्या संपर्कात होता,अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलीस बाल्याचीही चौकशी करीत आहेत. तसेच परशाला फिरायला घेऊन जाणाऱ्या किशोरचीही भूमिका संशयास्पद वाटल्यामुळे पोलीस त्याचीही चौकशी करीत आहे. विशेष म्हणजे, जमावाने किशोरच्या झेंडा चौकातील घराकडे धाव घेतली होती. तो आढळला नाही, त्यामुळे जमावाच्या रोषातून तो सुटला, असे आता बोलले जाते. हत्येचे कारण गुलदस्त्यात परश्याची हत्या कोणत्या कारणामुळे झाली ते अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी आरिफ कुख्यात गुन्हेगार असून, त्याचा अनेक गुन्हेगारांसोबत आणि काही राजकीय व्यक्तींसोबतही संबंध आहे. तो अवैध धंद्यांसोबतच खंडणी वसुलीतही सक्रिय आहे. परश्या क्रिकेट सट्ट्याची खायवाडी आणि कटिंग करायचा. यातून कमावलेले हजारो रुपये सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात द्यायचा. त्यामुळे त्याच्यासोबत युवकांची मोठी फौज जुळली होती. काही दिवसांपूर्वी परश्याने एका सामाजिक संघटनेचीही स्थापना केली होती. निवडणुकीच्या प्रचारात या संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्याने चांगले काम केले होते. बुकींकडून वसुली करणाऱ्या आरिफ आणि त्याच्या साथीदारांना परश्याने अलीकडे हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरिफसोबत त्यांचा वाद होता. आणखी काही बुकींना हप्ते देण्यापासून तो परावृत्त करीत होता. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. क्रिकेट मॅचमध्ये लगवाडी करणाऱ्यांकडे त्याचे लाखो रुपये होते. त्यामुळे त्याचा काही जणांशी वाद सुरू होता. त्या वादातून परश्याची हत्या करण्यात आल्याचीही चर्चा आहे. चिमुकल्याचे हरवले पितृछत्रपरश्याच्या निकटस्थ सूत्रांनुसार, त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला तीन महिन्यापूर्वीच बाळ झाले. मात्र, जन्मताच बाळाची प्रकृती खराब झाल्याने तीन महिन्यांपासून ते रुग्णालयातच होते, असे समजते. तीन दिवसांपूर्वीच बाळाला घरी आणण्यात आले. आरिफ आणि त्याच्या साथीदारांनी त्याची निर्घृण हत्या करून, पित्याचे छत्र हिरावून घेतले.पोलिसांचा लाठीमार दरम्यान, माहिती कळताच पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार घटनास्थळी पोहचले. जमावाने पोलिसांच्या एमएच ३१/ एजी ९६६८ क्रमांकाच्या मोबाईल व्हॅनवर जोरदार दगडफेक केली. पोलिसांनाही दगड लागले. परिस्थिती चिघळल्याचे पाहून पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यात मोहनलाल बत्रा, हरिश रुधवानी, ठाकूर पेठवानी, नरेश साधवानी, सतीश आनंदानी यांच्यासह १० ते १२ जण जखमी झाले. पहाटे ३ वाजेपर्यंत दगडफेक, लाठीमार आणि घोषणाबाजीचा प्रकार सुरू होता. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा दयानंद पार्क, वसंतशहा चौक भागात तणाव निर्माण झाला. जमावाने आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली. शिवाय लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधातही घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या दीपक पांडे यांनी जमावाची समजूत काढून आरोपींना तातडीने अटक करण्याचे जरीपटका पोलिसांना आदेश दिले.