शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

पहिले अनुसूचित जात प्रमाणपत्र गोवारी समाजाला प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:33 IST

कविता श्रावण सायरे या गोवारी समाजाच्या महिलेला पहिले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे.

ठळक मुद्दे२४ वर्षांनंतरच्या संघर्षाचे यश आता शासनाच्या अध्यादेशाची प्रतीक्षा

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कविता श्रावण सायरे या गोवारी समाजाच्या महिलेला पहिले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांना बहाल केले आहे. त्यांना मिळालेले हे अधिकृत प्रमाणपत्र १९८५ नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळाले आहे. यासाठी गोवारी समाजाला ११४ लोकांचा बळी द्यावा लागला. २४ वर्षांचा संघर्ष करावा लागला. त्यानंतर मिळालेले हे यश आहे.कविता सायरे यांनी १८ डिसेंबर २०१८ रोजी अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आर्वीच्या उपविभागीय अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी करून अर्ज प्रलंबित ठेवला होता. त्यामुळे कविता सायरे यांनी १४ आॅगस्ट २०१८ च्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी १८ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती आर.के. देशपांडे व विनय जोशी यांनी २५ जानेवारी रोजी निर्णय दिला. न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, सरकारच्या कुठल्याही परिपत्रक आणि जीआरची वाट न बघता गोवारींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. न्यायालयाचा आदेश कविता सायरे यांनी उपविभागीय अधिकाºयांना दाखविला असता, त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्रदान केले.स्वातंत्र्यानंतर गोवारींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत होते. पण शासनाने २४ एप्रिल १९८५ ला एक परिपत्रक काढून गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या अधिकारापासून वंचित केले. तेव्हापासून गोवारींचा संघर्ष सुरू झाला. २३ नोव्हेंबर १९९४ ला निघालेल्या मोर्चामध्ये ११४ गोवारी बांधवांचा बळी गेला. त्यानंतर सातत्याने आंदोलन, मोर्चे निघाले. न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी उच्च न्यायालयाने गोवारी हेच आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. याच निर्णयाच्या आधारे गोवारींना पहिले जात प्रमाणपत्र दिले आहे.

१४ आॅगस्ट २०१८ ला उच्च न्यायालयाने गोवारी आणि गोंडगोवारी एकच आहे असा निर्णय दिला. याच निर्णयाच्या आधारे न्यायालयाने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. न्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार मिळवून दिले. पण शासन अजूनही अध्यादेश न काढून गोवारींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे.- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना. 

टॅग्स :Governmentसरकार