शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पहिले अनुसूचित जात प्रमाणपत्र गोवारी समाजाला प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:33 IST

कविता श्रावण सायरे या गोवारी समाजाच्या महिलेला पहिले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे.

ठळक मुद्दे२४ वर्षांनंतरच्या संघर्षाचे यश आता शासनाच्या अध्यादेशाची प्रतीक्षा

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कविता श्रावण सायरे या गोवारी समाजाच्या महिलेला पहिले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांना बहाल केले आहे. त्यांना मिळालेले हे अधिकृत प्रमाणपत्र १९८५ नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळाले आहे. यासाठी गोवारी समाजाला ११४ लोकांचा बळी द्यावा लागला. २४ वर्षांचा संघर्ष करावा लागला. त्यानंतर मिळालेले हे यश आहे.कविता सायरे यांनी १८ डिसेंबर २०१८ रोजी अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आर्वीच्या उपविभागीय अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी करून अर्ज प्रलंबित ठेवला होता. त्यामुळे कविता सायरे यांनी १४ आॅगस्ट २०१८ च्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी १८ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती आर.के. देशपांडे व विनय जोशी यांनी २५ जानेवारी रोजी निर्णय दिला. न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, सरकारच्या कुठल्याही परिपत्रक आणि जीआरची वाट न बघता गोवारींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. न्यायालयाचा आदेश कविता सायरे यांनी उपविभागीय अधिकाºयांना दाखविला असता, त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्रदान केले.स्वातंत्र्यानंतर गोवारींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत होते. पण शासनाने २४ एप्रिल १९८५ ला एक परिपत्रक काढून गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या अधिकारापासून वंचित केले. तेव्हापासून गोवारींचा संघर्ष सुरू झाला. २३ नोव्हेंबर १९९४ ला निघालेल्या मोर्चामध्ये ११४ गोवारी बांधवांचा बळी गेला. त्यानंतर सातत्याने आंदोलन, मोर्चे निघाले. न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी उच्च न्यायालयाने गोवारी हेच आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. याच निर्णयाच्या आधारे गोवारींना पहिले जात प्रमाणपत्र दिले आहे.

१४ आॅगस्ट २०१८ ला उच्च न्यायालयाने गोवारी आणि गोंडगोवारी एकच आहे असा निर्णय दिला. याच निर्णयाच्या आधारे न्यायालयाने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. न्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार मिळवून दिले. पण शासन अजूनही अध्यादेश न काढून गोवारींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे.- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना. 

टॅग्स :Governmentसरकार