शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील मतदान पुन्हा व्हावे : आशिष देशमुख यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:56 IST

पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे की, पूर्वी एका मतदान केंद्रात दोन ईव्हीएम लावण्यात येत होते. परंतु व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे एका केंद्रात एक ईव्हीएम लावण्यात आले. शहरी भागात एका बुथवर १४०० व ग्रामीण भागात जास्तीत जास्त १२०० मतदारास मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी देण्यात आली. परंतु व्हीव्हीपॅट लावल्यामुळे एक मत टाकण्यासाठी ४६ सेकंदाचा वेळ लागला. अशा प्रकारे ठरलेल्या वेळेत केवळ ८६० मत टाकता येऊ शकतात. १४०० मत टाकणे अशक्य आहे.कमी मतदान होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. देशमुख यांनी सत्ताधारी पक्षाने आपल्या प्रभाव क्षेत्रातील एका मतदान केंद्रातील मतदारांची संख्या कमी केली तर इतर भागात एका बूथवर तुलनात्मकदृष्ट्या अधिक मतदार होते. त्यांनी सांगितले की, रामदासपेठ येथील एका बूथवर ८९६ तर बजेरिया येथे ७४५ मतदार होेते. तर सैफीनगर व मोमीनपुरा येथील बुथवर १३७३ आणि १२५७ मतदार होते. या भागात कमी मतदान व्हावे, यासाठीच हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshish Deshmukhआशीष देशमुख