शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उपराजधानीतील पहिल्या फायर स्टेशनची दूरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:39 IST

नागपूर शहरातील गंजीपेठ फायर स्टेशन जीर्ण झाले असून, ते केव्हाही कोसळण्याची स्थितीत आहे.

ठळक मुद्दे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाहीदुर्घटनेचा धोका

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंजीपेठ फायर स्टेशन जीर्ण झाले असून, ते केव्हाही कोसळण्याची स्थिती आहे. असे असताना या फायर स्टेशनला अद्याप धोकादायक घोषित करण्यात आले नाही. इतरांच्या जीर्ण इमारतींवर कारवाई करणारी महापालिका स्वत:च्याच इमारतीबाबत उदासीन आहे.हे शहरातील पहिले फायर स्टेशन आहे. हे फायर स्टेशन ९० वर्षे जुने आहे. त्याचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नाही. १९२७ मध्ये या फायर स्टेशनसोबत कर्मचाऱ्यांसाठी २५ क्वॉर्टरही बांधण्यात आले होते. आता येथील सर्वच बांधकामांचे प्लास्टर उखडत आहे. ठिकठिकाणी सळाखी बाहेर आल्या आहेत. सळाखी जंगल्या आहेत. अशी अवस्था असताना मनपाने या बांधकामांना धोकादायक घोषित केले नाही.सूत्रानुसार, येथील बांधकामाची दुरुस्ती व पुनर्विकासाकरिता गांधीबाग झोनच्या उपअभियंत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यावर कार्यवाही झाली नाही. काही दिवसांपूर्वी अजनी रेल्वे कॉलनी येथील एका क्वॉर्टरची बालकनी कोसळली होती. या कॉलनीचे बांधकाम १९७५ मध्ये झाले आहे. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन दिले. गंजीपेठ फायर स्टेशन व कॉलनी यापेक्षा जुनी आहे. परिणामी, मनपा अनुचित घटनेची प्रतीक्षा करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुनर्विकासाकरिता प्रस्ताव तयार१७००.८ वर्गमीटरमध्ये असलेले गंजीपेठ फायर स्टेशन व कॉलनीची दुरवस्था पाहता येथील कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कॉलनीत २५ ऐवजी १२ क्वॉर्टर बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात कर्मचाऱ्यांसाठी १-बीएचके व अधिकाऱ्यांसाठी २-बीएचके क्वॉर्टर राहतील. तसेच, महिला व पुरुष कर्मचाºयांसाठी वेगवेगळे विश्रामगृह, गॅरेज, ३ आॅफिस, स्टोअर रुम प्रस्तावित आहे. तळमाळ्यात पार्किंगची व्यवस्था राहील. हा प्रस्ताव लवकरच गांधीबाग झोनच्या उपअभियंत्यांना पाठविला जाणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट होईलगंजीपेठ फायर स्टेशनचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रस्तावित आहे. त्यानंतर त्याला धोकादायक घोषित करण्यावर निर्णय घेतला जाईल. याशिवाय नवीन इमारतीचा प्रस्तावही सभेत सादर केला जाईल. त्यानंतर आराखडा तयार करून बांधकाम सुरू केले जाईल.- राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.

टॅग्स :Governmentसरकार