शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन अभ्यासक्रम बंधनकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:51 IST

अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला निर्णय : अट शिथिल करण्याचे निर्देश

ऑनलाईन लोकमत नागपूर :अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याच्या अटीला शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर महापालिका व आपात्कालीन सेवा विभागात सेवा प्रवेशासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांच्यातर्फे मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांना १७ नोव्हेंबर २०१७ रोजी यासंबंधीचे पत्र जारी केले आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात सविस्तर रिपोर्ट मागितला आहे. मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांनी संबंधित पत्र अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांना पाठवून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मनपात नवीन आकृतिबंधाने भर्ती प्रक्रियेत अडचणी येणार नाही.नागपुरातील अग्निशमन विभागातील मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार अग्निशमामक विमोचकाच्या रिक्त पदासाठी सरळ भर्ती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. यासाठी पात्र उमेदवाराने राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र महाराष्ट्र मुंबईचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यासक्रमाची अट विदर्भातील युवकांसाठी नुकसानकारक होती. ती तातडीने रद्द करण्याची मागणी होत होती. अग्निशमन समितीचे सभापती अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा मुद्दा उचलला. तसेच महापौर नंदा जिचकार यांनाही ही अट रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते, हे विशेष.बालपांडे यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे अग्निशमन सेवेत येण्यास इच्छुक असलेल्या विदर्भातील युवकांचा मोठा लाभ होणार आहे. ही अट रद्द झाली नसती तर जितके पद आहेत, त्यापेक्षाही कमी उमेदवारांनी अर्ज केला असता. यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होतो. अखेर यश मिळाले. उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट ठेवली जाऊ शकते.कुठल्याही महिलेने अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाहीअग्निशामक विमोचकाच्या २५० जागा आहेत. पूर्वीची अट कायम राहिली तर ३० जागा सुद्धा भरल्या जाणार नाही. ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यांना सुद्धा हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट आहे. आजवर कुठल्याही महिलेने हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाही.