शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

अग्निशमन अभ्यासक्रम बंधनकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:51 IST

अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला निर्णय : अट शिथिल करण्याचे निर्देश

ऑनलाईन लोकमत नागपूर :अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याच्या अटीला शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर महापालिका व आपात्कालीन सेवा विभागात सेवा प्रवेशासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांच्यातर्फे मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांना १७ नोव्हेंबर २०१७ रोजी यासंबंधीचे पत्र जारी केले आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात सविस्तर रिपोर्ट मागितला आहे. मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांनी संबंधित पत्र अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांना पाठवून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मनपात नवीन आकृतिबंधाने भर्ती प्रक्रियेत अडचणी येणार नाही.नागपुरातील अग्निशमन विभागातील मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार अग्निशमामक विमोचकाच्या रिक्त पदासाठी सरळ भर्ती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. यासाठी पात्र उमेदवाराने राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र महाराष्ट्र मुंबईचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यासक्रमाची अट विदर्भातील युवकांसाठी नुकसानकारक होती. ती तातडीने रद्द करण्याची मागणी होत होती. अग्निशमन समितीचे सभापती अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा मुद्दा उचलला. तसेच महापौर नंदा जिचकार यांनाही ही अट रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते, हे विशेष.बालपांडे यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे अग्निशमन सेवेत येण्यास इच्छुक असलेल्या विदर्भातील युवकांचा मोठा लाभ होणार आहे. ही अट रद्द झाली नसती तर जितके पद आहेत, त्यापेक्षाही कमी उमेदवारांनी अर्ज केला असता. यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होतो. अखेर यश मिळाले. उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट ठेवली जाऊ शकते.कुठल्याही महिलेने अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाहीअग्निशामक विमोचकाच्या २५० जागा आहेत. पूर्वीची अट कायम राहिली तर ३० जागा सुद्धा भरल्या जाणार नाही. ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यांना सुद्धा हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट आहे. आजवर कुठल्याही महिलेने हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाही.