शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

आगीत तीन घराची राखरांगाेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : आधीच काेराेना संक्रमणाचे संकट. त्यात घरांना लागलेली आग. यामुळे रुयाड (ता. कुही) येथील तीन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : आधीच काेराेना संक्रमणाचे संकट. त्यात घरांना लागलेली आग. यामुळे रुयाड (ता. कुही) येथील तीन कुटुंबीयांच्या संकटात भर पडली असून, या आगीत घरातील संपूर्ण साहित्य व घराची राखरांगाेळी ते उघड्यावर आले आहे. आगीची ही घटना गुरुवारी (दि. २९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात किमान ३ लाख ८५ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या तिन्ही आगपीडितांनी दिली. या आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्रामीण भागातील नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यातच गुरुवारी दुपारी रुयाड (बांध) येथील कैलास डहारे यांच्या घराला आग आली. ही बाब लक्षात येताच गावातील तरुणांसह नागरिकांनी ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, ताेकड्या प्रयत्नामुळे ही आग पसरत गेली आणि आगीने कैलास डहारे यांच्या घराच्या शेजारील अंबादास डहारे व जगदीश डहारे या दाेघांचीही घरे कवेत घेतली.

स्थानिकांनी गावातील बाेअरवेल्स व विहिरींमधील माेटरंपप सुरू करून पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. ही आग नियंत्रणात येईपर्यंत तिन्ही घरातील बहुतांश वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या हाेत्या. या आगीत किमान ३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या तिन्ही आगपीडितांनी दिली. माहिती मिळताच आ. राजू पारवे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर, भागेश्वर फेंडर, सरपंच नेहा ढेंगे, नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे, तलाठी विठ्ठल सूर्यवंशी, ग्रामसेवक लिंगायत, उपासराव भुते, सुनील किंदर्ले, सुधीर पिल्लेवान, ओमदेेेव ढेंगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगपीडितांना दिलासा दिला. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. शासनाने या तिन्ही आगपीडितांना घरकूल मंजूर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

...

सुदैवाने प्राणहानी टळली

घरातील ज्येष्ठ मंडळी राेजगार हमी योजनेच्या कामावर गेली असल्याने घटनेच्या वेळी या तिन्ही घरांमध्ये केवळ लहान मुले हाेती. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व जण लगेच घराबाहेर पडले. त्यामुळे या आगीत प्राणहानी झाली नाही अथवा कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, तिन्ही घरातील धान्य, कपडे, राेख रक्कम, एक बोकड, कोंबड्या, सायकल तसेच गृहाेपयाेगी व इतर इतर साहित्य जळून राख झाले. विशेष म्हणजे, तिन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत.