शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

गडचांदुरात आगीचे तांडव - १३७ झोपड्या जळून खाक

By admin | Updated: June 1, 2014 00:59 IST

येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील मजुरांच्या झोपडपट्टीने शनिवारी आगीचा थरार अनुभवला. या परिसरात अचानकपणे लागलेली आग पाहता पाहता पसरली, भडकली अन् १३७ झोपड्या स्वाहा करुनच शमली.

६00 नागरिक बेघर : १७ सिलिंडर्स आगीत फुटले, जीवहानी टळलीगडचांदूर (जि. चंद्रपूर) : येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील मजुरांच्या झोपडपट्टीने शनिवारी आगीचा  थरार अनुभवला. या परिसरात अचानकपणे लागलेली आग पाहता पाहता पसरली, भडकली अन्  १३७ झोपड्या स्वाहा करुनच शमली. या भीषण घटनेत संपूर्ण घरे भुईसपाट झाली. मात्र कोणतीही  जीवित हानी झाली नसली तरी या गरिबांच्या वस्तीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त काहीही न उरल्याने ही माणसे आभाळाखाली आली आहेत. दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील विक्रमसिंग बहादुरसिंग भोंड यांच्या घरातून सुरुवातीला धूर  निघताना दिसला. त्यानंतर हळूहळू ही आग पसरत गेली. बाजूच्या घरालाही आगीने वेढले. तापलेले  ऊन्ह आणि बचावाची अपुरी साधने यामुळे अगदी काही वेळातच आगीने रौद्ररूप घेतले. पाहता  पाहता एकापाठोपाठ एक १३७ घरांना कवेत घेऊनच ही आग शमली.विक्रमसिंग भोंड यांच्या घरावरुन वीज तारा गेलेल्या असल्याने शाटसर्किटने आग लागल्याचा  अंदाज व्यक्त होत आहे. तर, काहींच्या मते त्यांचा सिलिंडर सुरू असल्यानेच ही आग लागल्याचे  सांगितले जात होते. प्रत्यक्षात आग कशाने लागली हे कळू शकले नाही. आग इतकी भीषण होती  की, अवघ्या तासाभरात ती संपूर्ण वसाहतीत पोहोचली. गावातील नागरिकांना ही घटना कळताच भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली. पोलिसांना आणि  नगर पालिकांना माहिती देऊन आगीचे बंब बोलाविण्यात आले. मात्र आगीच्या भीषणतेपुढे हे सर्व  प्रयत्न दुबळे पडले. राजुरा, बल्लारपूर नगरपरिषद, अल्ट्राटेक, अंबुजा व माणिकगड कंपनीचे  अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंंत सर्व काही संपलेले होते. तब्बल तीन  तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले.१७ सिलिंडर्स फुटलेआग इतकी भीषण होती की, जळालेल्या घरांमध्ये असलेल्या १७ सिलिंडरचा  स्फोट झाला. त्या  आवाजाने परिसरात प्रचंड धास्ती निर्माण झाली. धुराचे लोळ उंच उठत असल्याने आजुबाजूच्या  गावातील नागरिकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे एकच गर्दी झाली होती. आगीत पैसे,  सोने, धान्य, कपडे, इलेक्ट्रानिक साधने व इतर महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या. वस्ती दाट  असल्याने आणि घरे अगदी लागून असल्याने आग पसरायला वेळ लागला नाही. ही सर्व घरे कच्ची  असल्याने आग लवकर पसरत गेली. सर्वस्व हिरावलेया आगीत अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. पदरमोड करून जमा केलेली पुंजी आगीने गिळंकृत  केली. कुणाचे दागिने गेले, तर कुणाची कागदपत्रे जळाली. कापड, धान्य, पुस्तके, पासबुक, भांडी  यातील काहीही वाचविता आले नाही. शाकीर शाह जाकीर शाह यांनी बँकेत टाकण्यासाठी म्हणून  ६0 हजार रूपयांची रक्कम घरीच ठेवली होती. ती आगीत स्वाहा झाली. नासीर शाह गुलजार शाह  यांचीही पाच हजार रुपयांची रक्कम भस्मसात झाली.अनेकांकडून मदतघटनेचे वृत्त कळताच अनेकांनी धाव घेऊन बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. आमदार सुभाष  धोटे, कृषी सभापती अरुण निमजे, उपविभागीय अधिकारी शिरीष पांडे, तहसीलदार वलसरे,  सरपंच सुमनबाई आत्राम, उपसरपंच पापय्या पोन्नमवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी  केली. तलाठी वाटेकर व ग्रामविकास अधिकारी भडके यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात  आले असून सात दिवसंसाठी तात्पुरती मदत देण्याचे आदेश आमदार सुभाष धोटे यांनी दिले असून  शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. सध्या सर्व पीडितांसाठी  राहण्याची सोय जि.प. शाळेत करण्यात आली आहे.  (शहर प्रतिनिधी)