शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात उत्तर : खर्च वृद्धीची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.आरोपींमध्ये कंत्राटदार बाजोरिया कन्स्ट्रक्शनचे संचालक सुमित बाजोरिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंसाधन विभागाचे माजी मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस. आर. सूर्यवंशी, बुलडाणा सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता शरद गावंडे, अधीक्षक अभियंता बी. एस. वावरे, अधीक्षक अभियंता भीमाशंकर पुरी व कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या खर्च वृद्धीची चौकशी सुरू असून ती लवरकच पूर्ण केली जाईल असेही न्यायालयाला सांगण्यात आले आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील अन्य तीन प्रकल्पांबाबत राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विदर्भातील ३८ सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहाराची खुली चौकशी करीत असून त्यात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती शासनाने दिली आहे. तसेच, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प व दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची अमरावती जलसंसाधन विभागातील दक्षता केंद्राचे अधीक्षक अभियंत्यांनी चौकशी केली आहे. त्याचा अहवाल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी सादर करण्यात आला आहे. शासन त्या अहवालाची पडताळणी करीत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.या चारही प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात कंत्राटदार अतुल जगताप यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य शासनाच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी याचिकाकर्त्याला दोन आठवड्यांचा वेळ दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर