शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जैन कलार समाज ट्रस्ट घोटाळ्यात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवा :  हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:43 IST

जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला.

ठळक मुद्देविशेष लेखा परीक्षणही करण्यास सांगितले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला. तसेच, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे सहा महिन्यात विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे व ट्रस्टवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही दिले.संबंधित २२ जणांमध्ये तत्कालीन अध्यक्ष रवींद्र देवीदास दुरुगकर, उपाध्यक्ष भूषण शंकर दडवे, कोषाध्यक्ष विलास महादेव हरडे, सचिव आनंद नारायण ठवरे, वासुदेव यशवंत गोसेवाडे, राजू श्रीराम ठवरे, शैलेंद्र भास्कर दहीकर, किशोर यादव सिरपूरकर, रमेश मोतीराम कोलते, सुरेश हरिश्चंद्र भांडारकर, राजेश सुरेश डोरलीकर, विजय मनोहर दहीकर, भाऊराव शंकर फरांडे, सुधीर अण्णासाहेब दुरुगकर, प्रभाकर बळीराम तिडके, डॉ. पुष्पा चक्रधारी दुरुगकर, विक्रांत प्रभाकर पलांदूरकर, सुधाकर देवराव खानोरकर, नरेंद्र बबन पलांदूरकर, सुधीर मुकुंद रणदिवे, दिलीप श्याम रहाटे व सिद्धेश्वर गोविंद वारजूरकर यांचा समावेश आहे. यासंदर्भात ट्रस्टचे आजीवन सदस्य अनिल शंकर तिडके यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. अंतिम सुनावणीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हे आदेश देऊन याचिका निकाली काढली.याचिकाकर्त्याच्या तक्रारीनंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून २१ एप्रिल २०१८ रोजी अहवाल सादर केला होता. त्यावरून ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. परिणामी, संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला जाणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.असे होते याचिकाकर्त्याचे म्हणणेसंबंधित २२ व्यक्तींनी ट्रस्ट व ट्रस्टच्या निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केला. त्यांनी ट्रस्टचे कामकाज पाहताना कायदेशीर तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. ट्रस्टच्या निधीतून ब्रह्मपुरी येथे तब्बल ७२ लाख रुपयात केवळ एक एकर जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यातच समान खसऱ्यातील उर्वरित जमीन केवळ ८० हजार रुपयात विकल्या गेली. समाजाचे सभागृह व लॉन भाड्याने देताना पावत्या दिल्या जात नव्हत्या. त्यातून कोट्यवधी रुपये हडपण्यात आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने त्यांच्या विनंतीनुसार हे आदेश जारी केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार