शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 11:28 IST

सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?हायकोर्टाच्या आदेशानंतर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेच्या वतीने बुलडोजर चालविला जात आहे. मात्र मंदिर तोडणे हा हिंदू धर्मावर आघात असल्याचे कारण देत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेविरुद्ध बजरंग दलाचे ‘हनुमान’ मैदानात उतरले आहेत!गोरगरीब विद्यार्थ्यांचे मंदिर आणि श्रद्धास्थान असलेल्या महापालिकेच्या ३५ शाळा बंद पडल्या तरी याविरुद्ध ना बजरंग दलाने लोकआंदोलन उभे केले ना मराठीचा लळा असलेल्या शिवसेना आणि मनसेने! मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात कृती समितीची उभारणी झाली. या समितीत बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेली कृतीही तितकीच ‘शून्य’ आहे.देशात, राज्यात आणि नागपुरात सत्ता असलेल्या भाजपचा डिजिटलायझेशनवर भर आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून सरकारने विकासाचा मंत्र दिला आहे. मात्र १५ वर्षांची सत्ता उपभोगूनही भाजपला बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा ‘स्टॅण्ड अप’ का करता आल्या नाही ? याबाबत मन की बात करण्यासाठी भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. चार वर्षांत ४,१६१ विद्यार्थी कमी होणे. त्यामुळे ३५ शाळा बंद पडणे ही बाब ‘इनोव्हेटिव्ह सिटी’चा नंबर १ पुरस्कार पटकाविणाऱ्या नागपूरसाठी निश्चितच लाजिरवाणी आहे. त्यामुळे महापालिका आणि सरकार सीबीएसई शाळामालकांच्या समर्थनात तर नाही ना, असा कुणी आरोप केल्यास तो चुकीचा ठरेल का? बंद पडलेल्या मनपा शाळांच्या जीर्णोद्धारासाठी भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार, ज्येष्ठ गोंधीवादी विचारवंत लीलाताई चितळे कृती समितीच्या आंदोलनात दिसल्या. मात्र या आंदोलनाला लोकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने सत्ताधाऱ्यांनी आणि सीबीएसईवाल्यांनी यात ‘आनंद’ मानला. पालिकेप्रमाणे जि.प. शाळांची हीच अवस्था आहे. राज्यात आजही काही अशा सरकारी शाळा आहेत, त्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे ‘कुलदैवत’ आहेत. यात पंढरपूरच्या पांढरेवस्ती येथील जि.प.शाळेचा नंबर लागतो. ही शाळा ३६५ दिवस सुरू असते. रविवारची सुटी नसते. औरंगाबादच्या सांजखेडा येथील जि.प. शाळाही त्यातलीच एक आहे.सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्याला लाजवेल त्यापेक्षाही चांगले इंग्रजी या शाळेचे विद्यार्थी बोलतात. पंढरपूर, औरंगाबाद आणि भंडारा जिल्ह्यातील खराशीच्या जि.प. शाळात हे शक्य आहे तर ‘इनोव्हेटिव्ह’ आणि स्मार्ट नागपुुरात हे का होत नाही ?शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्यास नागपुरात दानदात्यांचीही कमतरता नाही. गिरीश गांधींसारख्या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यास तासाभरात हे होऊ शकते. शिर्डीच्या साई संस्थानने एका झटक्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी ७१ कोटींचे दान दिले. कोट्यवधीच्या दानाच्या बळावर नागपुरातही टेकडीच्या गणेशाला सोन्याचा मुकुट चढवून जीर्णोद्धार केला जात आहे. लोकसभा तोंडावर आल्याने यूपीत योगी आदित्यनाथांनी ‘राम’जप सुरू केला आहे. मात्र महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत?

टॅग्स :Schoolशाळा