शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 11:28 IST

सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?हायकोर्टाच्या आदेशानंतर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेच्या वतीने बुलडोजर चालविला जात आहे. मात्र मंदिर तोडणे हा हिंदू धर्मावर आघात असल्याचे कारण देत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेविरुद्ध बजरंग दलाचे ‘हनुमान’ मैदानात उतरले आहेत!गोरगरीब विद्यार्थ्यांचे मंदिर आणि श्रद्धास्थान असलेल्या महापालिकेच्या ३५ शाळा बंद पडल्या तरी याविरुद्ध ना बजरंग दलाने लोकआंदोलन उभे केले ना मराठीचा लळा असलेल्या शिवसेना आणि मनसेने! मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात कृती समितीची उभारणी झाली. या समितीत बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेली कृतीही तितकीच ‘शून्य’ आहे.देशात, राज्यात आणि नागपुरात सत्ता असलेल्या भाजपचा डिजिटलायझेशनवर भर आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून सरकारने विकासाचा मंत्र दिला आहे. मात्र १५ वर्षांची सत्ता उपभोगूनही भाजपला बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा ‘स्टॅण्ड अप’ का करता आल्या नाही ? याबाबत मन की बात करण्यासाठी भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. चार वर्षांत ४,१६१ विद्यार्थी कमी होणे. त्यामुळे ३५ शाळा बंद पडणे ही बाब ‘इनोव्हेटिव्ह सिटी’चा नंबर १ पुरस्कार पटकाविणाऱ्या नागपूरसाठी निश्चितच लाजिरवाणी आहे. त्यामुळे महापालिका आणि सरकार सीबीएसई शाळामालकांच्या समर्थनात तर नाही ना, असा कुणी आरोप केल्यास तो चुकीचा ठरेल का? बंद पडलेल्या मनपा शाळांच्या जीर्णोद्धारासाठी भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार, ज्येष्ठ गोंधीवादी विचारवंत लीलाताई चितळे कृती समितीच्या आंदोलनात दिसल्या. मात्र या आंदोलनाला लोकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने सत्ताधाऱ्यांनी आणि सीबीएसईवाल्यांनी यात ‘आनंद’ मानला. पालिकेप्रमाणे जि.प. शाळांची हीच अवस्था आहे. राज्यात आजही काही अशा सरकारी शाळा आहेत, त्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे ‘कुलदैवत’ आहेत. यात पंढरपूरच्या पांढरेवस्ती येथील जि.प.शाळेचा नंबर लागतो. ही शाळा ३६५ दिवस सुरू असते. रविवारची सुटी नसते. औरंगाबादच्या सांजखेडा येथील जि.प. शाळाही त्यातलीच एक आहे.सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्याला लाजवेल त्यापेक्षाही चांगले इंग्रजी या शाळेचे विद्यार्थी बोलतात. पंढरपूर, औरंगाबाद आणि भंडारा जिल्ह्यातील खराशीच्या जि.प. शाळात हे शक्य आहे तर ‘इनोव्हेटिव्ह’ आणि स्मार्ट नागपुुरात हे का होत नाही ?शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्यास नागपुरात दानदात्यांचीही कमतरता नाही. गिरीश गांधींसारख्या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यास तासाभरात हे होऊ शकते. शिर्डीच्या साई संस्थानने एका झटक्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी ७१ कोटींचे दान दिले. कोट्यवधीच्या दानाच्या बळावर नागपुरातही टेकडीच्या गणेशाला सोन्याचा मुकुट चढवून जीर्णोद्धार केला जात आहे. लोकसभा तोंडावर आल्याने यूपीत योगी आदित्यनाथांनी ‘राम’जप सुरू केला आहे. मात्र महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत?

टॅग्स :Schoolशाळा