शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांसाठी जागा शोधा

By admin | Updated: March 9, 2016 03:25 IST

टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसात शासकीय जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : प्रस्ताव सादर करावानागपूर : टायगर गॅप झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसात शासकीय जागेचा शोध घेऊन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या झोपडपट्टीतील आदिवासींना हजारी पहाड येथील म्हाडाच्या जमिनीवर पुनर्वसन करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, प्रा. अनिल सोले आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.१७३ झोपडपट्टीवासी आदिवासींची यादी तयार आहे. ही यादी म्हाडाला दिल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार टॉयगर गॅपच्या जागेवरून आदिवासींना उठविण्यात आले. तेव्हाच न्यायालयाने शासकीय जागेवर त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले होते. पण पुनर्वसन अजून झाले नाही. त्यावेळी हजारी पहाड येथे म्हाडाची जागा आहे. त्या जागेवर पुनर्वसन होऊ शकते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले होते. याकडे आमदार देशमुख यांनी लक्ष वेधले. ही झोपडपट्टी उठवण्यासंदर्भातील आंदोलनात आपण स्वत: सहभागी झालो होतो, असे आमदार प्रकाश गजभिये म्हणाले.म्हाडाच्या घरकुल योजनेत या आदिवासींसाठी १७३ घरकुले राखीव ठेवा, असा पर्यायही बैठकीत आला. पण म्हाडा मोफत घरे देऊ शकत नाही. या घरकुलाची किंमत ७.५० लाख आहे. तसेच आदिवासी गरीब असल्याने ते ही किंमत देऊ शकत नाही त्यामुळे म्हाडाच्या योजनेत हे पुनर्वसन होऊ शकत नाही. यावर पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, १५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांना सोबत घेऊन शासकीय जागेचा शोध घ्यावा व एक पुनर्वसनाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवावा. दरम्यान आदिवासींना शासकीय जागांचे पट्टे द्यावे, अशी मागणीही आमदार देशमुख यांनी केली.(प्रतिनिधी)