शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

अखेर पावसाळ्याने विदर्भातून गाशा गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 20:36 IST

Nagpur News लांब मुक्काम ठाेकलेल्या मान्सूनने अखेर विदर्भातून आपला गाशा गुंडाळला आहे. महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास अखेरच्या टप्प्यात असून २४ ऑक्टाेबर पर्यंत पूर्ण एक्झिट हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नागपूर : आज जाईल,उद्या जाईल असे करीत लांब मुक्काम ठाेकलेल्या मान्सूनने अखेर विदर्भातून आपला गाशा गुंडाळला आहे. महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास अखेरच्या टप्प्यात असून २४ ऑक्टाेबर पर्यंत पूर्ण एक्झिट हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दाेन दिवसांपासून विदर्भात आकाश स्वच्छ आणि निरभ्र आहे. त्यामुळे आर्द्रता सुद्धा ५५ ते ६५ टक्क्यापर्यंत खाली आली आहे. तापमानातही काही अंशाची वाढ झाली आहे. मात्र ऑक्टाेबर हिटचा परिणाम कुठेही जाणवत नाही. रात्रीच्या तापमानात घसरण झाली असून थंडीची जाणीव हाेत आहे.

दरम्यान विदर्भ व मराठवाडा वगळता राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण हाेते आणि तुरळक ठिकाणी अगदीच क्षुल्लक पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. २३ पासून मात्र सर्वत्र निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल. २४ ऑक्टाेबर हा महाराष्ट्रात रेंगाळलेल्या पावसाळ्याचा अखेरचा दिवस ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढचे काही दिवस अशीच उघडीप राहणार असून दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता अजिबात नाही.

सध्या तापमानातील फरक पाहता पहाटेचे किमान तापमान हे सरासरी पेक्षा ३ डिग्रीने अधिक म्हणून अपेक्षित थंडीचा अभाव तर दुपारचे कमाल तापमान हे सरासरी पेक्षा ३ डिग्रीने कमी म्हणून ऑक्टोबर हिटचा ही अभाव जाणवतो आहे. त्याचबरोबर आजपासून निरभ्र आकाशासहित हळूहळू थंडीतही वाढ होईल. चक्रीवादळाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.

टॅग्स :Rainपाऊस