शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागपूरचे कॉटन मार्केट उघडलेच नाही  :  महापौरांचे निर्देश पाळले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:50 IST

महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.

ठळक मुद्देबाजाराचे सर्व गेट बंद, रेशीमबागेत गर्दी

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कॉटन मार्केट बंद राहील, असे बोर्ड कॉटन मार्केटच्या गेटवर झळकत आहे. त्यानंतरही महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.कॉटन मार्केट शनिवारपासून सुरू होणार असल्याचे आदेश महापौरांनी दिले. तसे वृत्तही सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. त्यानुसार पहाटेपासून शेतकऱ्यांनी गाड्यांमधून भाज्या बाजारात आणल्या, शिवाय व्यापारी आणि अडतिये पोहोचले. पण मनपा कर्मचाऱ्यांनी आदेश नसल्याने गेट उघडता येणार नाही, असे सांगून सर्वांना परत पाठविले.महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, निर्जंतुकीकरणासाठी बाजार दोन दिवस बंद ठेवणार असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले होते. पण सहा दिवसानंतरही बाजार सुरू झाला नाही. महापौरांनी बाजार सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व अडतिये पहाटेच बाजार परिसरात पोहोचलो. पण प्रवेशद्वार बंद होते. शेतकऱ्यांनी ४५ ते ५० गाड्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. वाट पाहिल्यानंतर त्यांनाही भाज्या अन्य बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कॉटन मार्केट सुरू करण्याची शेतकरी, व्यापारी आणि अडतियांची मागणी आहे. त्यानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना प्लॅन दिला आहे. गर्दी होऊ नये म्हणून सात गेटऐवजी दोन गेट सुरू करण्यास सांगितले आहे. शिवाय गाड्यांमधून भाज्या उतरवून दुकानात ठेवण्याची माहिती दिली आहे. दुकानातूनच विक्री करू, असे आम्ही सांगितले आहे. पण आयुक्तांनी या नियोजनावर अजूनही निर्णय घेतला नाही.याउलट कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये येणारे शेतकरी गाड्या घेऊन रेशीमबाग आणि अन्य ठिकाणी जात आहे. रेशीमबागेत गाड्या आणि भाज्या खरेदी करणाºया ग्राहकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कॉटन मार्केटमध्ये शेतकºयांना भाज्या विक्रीला परवानगी दिल्यास रेशीमबागेत गर्दी होणार नाही, असे महाजन म्हणाले.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केटMayorमहापौर