शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

प्रदूषण नियंत्रणासाठी औष्णिक वीज प्रकल्पांना अखेरची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 11:33 IST

केंद्रीय मंत्रालयाचा निर्णय, २०२७ पर्यंत उपाय न केल्यास प्रकल्प बंद करण्याचा इशारा

नागपूर : अति प्रदूषणाच्या श्रेणीत गणल्या जाणाऱ्या काेळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांना प्रदूषित उत्सर्जन नियंत्रित करणारे उपकरण लावण्यासाठी दाेन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. टाटा पाॅवर, अदानी पाॅवर व जेएसडब्ल्यू यासारख्या खासगी कंपन्यांनाही ही सवलत मिळणार आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत उपाययाेजना न केल्यास दंडात्मक कारवाई आणि २०२७ पर्यंत न केल्यास वीज प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने ५ सप्टेंबर राेजी हे परिपत्रक जारी केले. या वीज प्रकल्पांना ‘फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन’ (एफजीडी) तंत्रज्ञान उपकरण बसवावेच लागणार आहे. मंत्रालयाने मार्च २०२१ ला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) तसेच मंत्रालयाचे प्रतिनिधी व सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथाॅरिटी प्रतिनिधींचे टास्क फाेर्स तयार करून वीज प्रकल्पांची तीन गटात विभागणी केली.

राष्ट्रीय राजधानीच्या १० किलाेमीटरच्या परिघात व दहा लाखांपेक्षा अधिक लाेकसंख्या असलेल्या शहरालगतच्या प्रकल्पांना ‘ए’ श्रेणीत, अधिक लाेकसंख्या घनता असलेल्या शहराजवळच्या प्रकल्पांना ‘बी’ श्रेणी व उर्वरित प्रकल्पांना ‘सी’ श्रेणीत विभागणी केली. त्यानुसार ‘ए’ श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२४ पर्यंत एफजीडी लावायचे आहे. ‘बी’श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर २०२५ पर्यंत आणि ‘सी’ श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर २०२६ पर्यंत उपकरण बसवायचे आहे. उपाययाेजना न केल्यास ए श्रेणीच्या प्रकल्पांवर २०२४ पासून व उर्वरित प्रकल्पांवर २०२६ पासून दंडात्मक कारवाई केली जाईल. २०२७ नंतर मात्र प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यापूर्वी २०१७ पर्यंत हाेती डेडलाइन

७ डिसेंबर २०१५ मध्ये मंत्रालयाने सल्फर डायऑक्साईडच्या उत्सर्जनाबाबत मापदंड निर्धारित केले हाेते आणि परिपत्रक काढल्यापासून दाेन वर्षांत म्हणजे २०१७ पर्यंत उपाययाेजना करण्याचे आदेश काढले हाेते. मात्र, त्यानंतरही मुदतवाढ देण्यात आली. पुढच्या काळात काेराेनामुळे प्रक्रिया थंडबस्त्यात गेली.

राज्यातील वीज प्रकल्पांनी केले दुर्लक्ष

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री अश्विनीकुमार चाैबे यांनी मार्चमध्ये राज्यसभेत सांगितले, केंद्र सरकार अधिन आणि खासगी अशा २० कंपन्यांनी प्रकल्पांमध्ये एफजीडी तंत्रज्ञान इन्स्टाॅल केले आहे. मात्र, राज्य सरकारे चालवित असलेल्या एकाही औष्णिक वीज प्रकल्पांनी प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान इन्स्टाॅल केले नसल्याचे त्यांनी सांगितले.