शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

सिनेमाचा झगमगाट सोडून शेतातील मातीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:12 IST

एखादी व्यक्ती चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द सोडून राबण्यासाठी काळ्या मातीत येत असेल तर? फिल्मफेअर पुरस्कार विजेता, प्रख्यात कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे त्या मनस्वी अवलियाचे नाव आहे.

ठळक मुद्देलीलाधर सावंतांचा मनस्वी प्रवास अनेक आघात झेलून नव्याने रुजण्याची उमेद

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे मायानगरीचे बॉलिवूड, हवेहवेसे वाटणाऱ्या या झगमगाटाचे सर्वांना आकर्षण आहे. दुसरीकडे शेतीचे असे जग, ज्याच्या वाईट अवस्थेमुळे कुणीही तिकडे जाण्यास तयार नाही. सिनेमात शेती येत असली तरी या दोन जगांचा तसा संबंध येत नाही. पण एखादी व्यक्ती चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द सोडून राबण्यासाठी काळ्या मातीत येत असेल तर.? फिल्मफेअर पुरस्कार विजेता, प्रख्यात कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे त्या मनस्वी अवलियाचे नाव आहे. अर्थातच या प्रवासामागे निष्ठूर आघातांची हृदय हेलावणारी कहाणी दडलेली आहे.‘सागर’ या सुपरहिट चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या लीलाधर सावंतांचा पुढचा प्रवास स्वप्नवत असाच होता. मोठ्यातला मोठा चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता त्यांच्याकडून चित्रपटाचे सेट्स बनवून घेण्यास तयार होता. शहंशाह, क्रांतिवीर, हत्या, सलाखे, अनाडी, मै खिलाडी तू अनाडी, १०० डेज अशा एकेक करीत तब्बल १७७ हिंदी चित्रपटांचे आणि चार हॉलिवूडच्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन या अवलियाने केले. बॉलिवूडच्या ३७ वर्षांच्या प्रवासात त्यांनी सर्वकाही प्राप्त केले होते आणि अचानक नियतीने एक मोठा आघात त्यांच्यावर केला. त्यांचाच वारसा घेऊन कलेच्या क्षेत्रात सुरुवात करू पाहणारा त्यांचा मुलगा विशाल १४ वर्षांपूर्वी कॅन्सरने हे जग सोडून गेला. या आघाताने प्रचंड निराश झालेले सावंत मायानगरीतील सर्वकाही सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका या गावाकडे परतले आणि वडिलोपार्जित शेती करू लागले.काही कामानिमित्त नागपूरला मुक्कामाला असलेल्या लीलाधर सावंत यांनी लोकमतशी संवाद साधला. प्रेमविवाह केल्यानंतर घरचा विरोध पत्करून ते सैन्यदलात भरती झाले. पाच वर्ष सेवेनंतर परतले तर वडिलांनी घराबाहेर काढले. त्यामुळे ते मुंबईला गेले. काम मिळविताना त्यांनी सुरुवातीला एका कला दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काम केले. पण संधी मिळाली तेव्हा स्वत:चे कौशल्यही सिद्ध केले व यशस्वीही झाले.एवढ सर्व प्राप्त करूनही मुलाच्या मृत्यूने पुरते खचलेल्या लीलाधर यांना ही चंदेरी दुनिया नकोशी झाली होती.गावी आल्यावर ते अलिप्त राहून शेती करायला लागले होते. बॉलिवूडच्या झगमगाटाचा काडीचाही संबंध राहिला नव्हता. मित्रांना मात्र त्यांच्यातील कला मरू द्यायची नव्हती. त्यांनी गणपती व दुर्गा मंडळाच्या सेट्स उभारणीसाठी सावंत यांनी प्रेरित केले. आर्थिक फसगत व निराशेमुळे अधिक मानसिक धक्का बसत गेला व सात महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज व पॅरालिसिसचा आघात बसला.

नवी उमेद कायमकदाचित कुटुंबाच्या सोबतीमुळे व मित्रांच्या सहकार्यामुळे ते पुन्हा नव्याने उभे राहिले आहेत. मात्र पूर्वीसारखी चपळता आता राहिली नाही. शब्द अडखळतात व स्मृतीही साथ सोडते. मात्र त्यांच्यातील नवी उमेद कायम आहे. ते पुन्हा कलेला समर्पित होऊ पाहत आहेत. 

टॅग्स :bollywoodबॉलिवूड