शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमाचा झगमगाट सोडून शेतातील मातीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:12 IST

एखादी व्यक्ती चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द सोडून राबण्यासाठी काळ्या मातीत येत असेल तर? फिल्मफेअर पुरस्कार विजेता, प्रख्यात कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे त्या मनस्वी अवलियाचे नाव आहे.

ठळक मुद्देलीलाधर सावंतांचा मनस्वी प्रवास अनेक आघात झेलून नव्याने रुजण्याची उमेद

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे मायानगरीचे बॉलिवूड, हवेहवेसे वाटणाऱ्या या झगमगाटाचे सर्वांना आकर्षण आहे. दुसरीकडे शेतीचे असे जग, ज्याच्या वाईट अवस्थेमुळे कुणीही तिकडे जाण्यास तयार नाही. सिनेमात शेती येत असली तरी या दोन जगांचा तसा संबंध येत नाही. पण एखादी व्यक्ती चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द सोडून राबण्यासाठी काळ्या मातीत येत असेल तर.? फिल्मफेअर पुरस्कार विजेता, प्रख्यात कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे त्या मनस्वी अवलियाचे नाव आहे. अर्थातच या प्रवासामागे निष्ठूर आघातांची हृदय हेलावणारी कहाणी दडलेली आहे.‘सागर’ या सुपरहिट चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या लीलाधर सावंतांचा पुढचा प्रवास स्वप्नवत असाच होता. मोठ्यातला मोठा चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता त्यांच्याकडून चित्रपटाचे सेट्स बनवून घेण्यास तयार होता. शहंशाह, क्रांतिवीर, हत्या, सलाखे, अनाडी, मै खिलाडी तू अनाडी, १०० डेज अशा एकेक करीत तब्बल १७७ हिंदी चित्रपटांचे आणि चार हॉलिवूडच्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन या अवलियाने केले. बॉलिवूडच्या ३७ वर्षांच्या प्रवासात त्यांनी सर्वकाही प्राप्त केले होते आणि अचानक नियतीने एक मोठा आघात त्यांच्यावर केला. त्यांचाच वारसा घेऊन कलेच्या क्षेत्रात सुरुवात करू पाहणारा त्यांचा मुलगा विशाल १४ वर्षांपूर्वी कॅन्सरने हे जग सोडून गेला. या आघाताने प्रचंड निराश झालेले सावंत मायानगरीतील सर्वकाही सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका या गावाकडे परतले आणि वडिलोपार्जित शेती करू लागले.काही कामानिमित्त नागपूरला मुक्कामाला असलेल्या लीलाधर सावंत यांनी लोकमतशी संवाद साधला. प्रेमविवाह केल्यानंतर घरचा विरोध पत्करून ते सैन्यदलात भरती झाले. पाच वर्ष सेवेनंतर परतले तर वडिलांनी घराबाहेर काढले. त्यामुळे ते मुंबईला गेले. काम मिळविताना त्यांनी सुरुवातीला एका कला दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काम केले. पण संधी मिळाली तेव्हा स्वत:चे कौशल्यही सिद्ध केले व यशस्वीही झाले.एवढ सर्व प्राप्त करूनही मुलाच्या मृत्यूने पुरते खचलेल्या लीलाधर यांना ही चंदेरी दुनिया नकोशी झाली होती.गावी आल्यावर ते अलिप्त राहून शेती करायला लागले होते. बॉलिवूडच्या झगमगाटाचा काडीचाही संबंध राहिला नव्हता. मित्रांना मात्र त्यांच्यातील कला मरू द्यायची नव्हती. त्यांनी गणपती व दुर्गा मंडळाच्या सेट्स उभारणीसाठी सावंत यांनी प्रेरित केले. आर्थिक फसगत व निराशेमुळे अधिक मानसिक धक्का बसत गेला व सात महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज व पॅरालिसिसचा आघात बसला.

नवी उमेद कायमकदाचित कुटुंबाच्या सोबतीमुळे व मित्रांच्या सहकार्यामुळे ते पुन्हा नव्याने उभे राहिले आहेत. मात्र पूर्वीसारखी चपळता आता राहिली नाही. शब्द अडखळतात व स्मृतीही साथ सोडते. मात्र त्यांच्यातील नवी उमेद कायम आहे. ते पुन्हा कलेला समर्पित होऊ पाहत आहेत. 

टॅग्स :bollywoodबॉलिवूड