शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

जमीन हडपणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:28 IST

निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहानकर आणि सतीश भाऊरावजी शहानकर (रा. वानाडोंगरी) अशी आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देगरीब महिलेची फसवणूक : बापलेकासह चार आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहानकर आणि सतीश भाऊरावजी शहानकर (रा. वानाडोंगरी) अशी आरोपींची नावे आहेत.तक्रारकर्त्या महिलेचे नाव सिंधूताई रामकृष्ण नस्से (वय ४०) असून, त्या वानाडोंगरीतील जुन्या वस्तीत राहतात. एमआयडीसीतील हिंगणा मार्गावर मौजा वानाडोगरीत (खसरा नंबर ३५०) सिंधूतार्इंच्या वडिलांची जमीन आहे. ०.५४ आर जमिनीपैकी ०.४० आर (एक एकर) जमीन सिंधूतार्इंचे वडील नत्थूजी लडी यांनी ७ जून १९८४ ला दस्तनंबर ३७३०/ १९८४ प्रमाणे आरोपी वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी) यांना विकली होती. त्यातील ०.१४ आर जमीन तशीच होती. या जमिनीकडे मूळ मालक आणि त्यांच्या वारसाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून आरोपी बेदरकर बापलेकाने सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नागपूर या संस्थेला ही जमीन विकली. त्यावेळी त्यांनी केलेल्या विक्रीपत्रात ०.४० ऐवजी ०.५४ आर जमिनीचे विक्रीपत्र आरोपींनी करून दिले. सहकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यीदित नागपूरचे अध्यक्ष सेवकराव शहानकर आणि सचिव सतीश शहानकर या दोघांनी बेदरकर बापलेकाच्या कटकारस्थानात सहभागी होऊन निराधार सिंधूतार्इंच्या वडिलांची ०.१४ आर (सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट) जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या ताब्यात घेतली. त्यावर लेआऊट टाकून भूखंडही विकून टाकले. १६ जानेवारी १९९२ पासून आरोपी बेदरकर पिता-पुत्र, सेवकराम शहानकर आणि सतीश शहानकर यांनी ही बनवाबनवी केली. ती ध्यानात आल्यानंतर सिंधूतार्इंनी वारंवार त्यांच्याकडे आपली जमीन परत मिळावी म्हणून आर्जव-विनंत्या केल्या, मात्र त्यांना आरोपींनी दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी चौकशीअंती भादंविच्या कलम ४२०, ११४ अन्वये गुन्हा दाखल केला.भूमाफियांना खुले रानया प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र आरोपींना अटक झाली की नाही, ते पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. लाखो रुपयांच्या जमिनींच्या प्रकरणात बरेचदा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तातडीने अटक केली जात नाही. अनेक प्रकरणांत पोलीस माहितीही उशिरा देतात. पोलिसांची अशी साथ मिळाल्यामुळे आरोपी अटकपूर्व जामीन मिळवतात. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या हिंगण्यातील सतीश मुंडे प्रकरणासह अनेक प्रकरणांत ठिकठिकाणच्या पोलिसांनी अशी संशयित भूमिका वठवली आहे. आरोपींना अटक झाली की नाही, अशी विचारणा केली असता चौकशी सुरू आहे, असे उत्तर देऊन पोलीस मोकळे होतात. पोलिसांकडूनच रान मोकळे झाल्यामुळे भूमाफिया अनेक गरीब आणि पीडितांची जमीन राजरोसपणे हडपत आहेत. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर