शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खड्डे बुजवा; अन्यथा कारवाई : मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:00 IST

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्यासह विविध विभागांना पत्र पाठवून सात दिवसात खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देनिर्देशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभागावर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्यासह विविध विभागांना पत्र पाठवून सात दिवसात खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले. तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतरही काही विभागाकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची औपचारिकता केली जात आहे. यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रारी येत आहेत. याची दखल घेत आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.विशेषता एनएचएआय,बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएलच्या कामाबाबत आयुक्त समाधानी नाहीत. खड्डे बुजवण्यासाठी सात दिवसाची मुदत दिली होती. परंतु या कालावधीत पाऊ स होता. पावसात खड्डे बुजवणे शक्य नाही. त्यानंतरही काही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्यात आले. आता पाऊ स थांबला आहे. खड्डे बुजवण्याचे काम गतीने केले जाईल. महापालिकेचा हॉटमिक्स प्लँट व नासुप्रचा हॉटमिक्स प्लँट यांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. याचे परिणाम दिसत आहे. मात्र एनएचएआय, बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्या अधिकार क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. तक्रारींची दखल गांभीर्याने घेतली आहे. पत्र पाठवून काम होत नसेल तर कारवाई केली जाईल. असा इशारा आयुक्तांनी दिला.पारडी भागातील खड्ड्यांची जबाबदारी एनएचएआयचीपारडी उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी मिळत आहे. येथील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी एनएचएआयची आहे. कारण वर्धमाननगर, प्रजापतीनगर, पारडी चौक, कळमना मार्केट, जुना भंडारा रोड, पारडी बाजार व वाठोडा येथील रस्ते उड्डाणपुलाच्या कक्षेत येतात. येथे महामेट्रोचे काम सुरू असले तरी खड्डे एनएचएआयला बुजवायचे आहे. यासंदर्भात मंगळवारी एनएचएआयच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली. या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.नादुरुस्त रस्त्यांची चौकशी करणारसध्या शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानंतर कोणता रस्ता वर्षभरात वा दीड वर्षात नादुरुस्त झाला याची माहिती घेतली जाईल. दायित्व कालावधीत रस्ते नादुरुस्त झाल्यास संबंधित कंत्राटदाराने रस्ते दुरुस्त करावे, यासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल. गुणवत्तेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAbhijit Bangarअभिजित बांगरcommissionerआयुक्त