शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दाेन दिवस ताप, मग मिळेल ‘अवकाळी’चा गारवा, १६ ते १९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण

By निशांत वानखेडे | Updated: March 13, 2024 20:00 IST

ऊन्हाचा पाहता सध्या तरी हाेरपळच!

निशांत वानखेडे, नागपूर : सूर्याच्या तापामुळे हाेरपळणाऱ्या विदर्भातील नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे दाेन दिवस आणखी ताप सहन केल्यानंतर त्यापुढचे चार दिवस ‘अवकाळी’चा गारवा मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे १६ ते १९ मार्चदरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यात अगदीच किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

उन्हाळा सुरू हाेताच सूर्याने पुन्हा आग ओकणे सुरू केले असून विदर्भावर तीव्रता जरा जास्तच आहे. नागपूरचा पारा २४ तासात अंशत: वाढून बुधवारी ३८.७ अंशावर पाेहचला, जाे सरासरीपेक्षा ३.१ अंशाने अधिक आहे. ३९.४ अंशासह चंद्रपूर व ३९ अंशासह यवतमाळ सर्वाधिक तापत आहेत. वर्धा अंशत: वाढून ३८.८ अंशावर गेला आहे, तर अकाेला, वाशिम, गाेंदिया, अमरावतीत अंशत: घट हाेत तापमान अनुक्रमे ३८ अंश, ३८.४ अंश, ३७ अंश व ३६.४ अंशावर आहे. रात्रीच्या उष्णतेतही वाढ झाली आहे.

दरम्यान १६ मार्चपासून चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र नागपूर, अमरावती, गाेंदिया व गडचिराेली या चारच जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. शेतकरी रबी पिक काढण्याची लगबगीत लागले आहेत. मात्र अवकाळीच्या शक्यतेने घाबरण्याची गरज नाही, असे अवाहन हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण अवकाळीचा पाऊस हा अगदीच किरकाेळ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस