शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

खताच्या किमती वाढणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 02:48 IST

देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते.

हंसराज अहीर : शासकीय रुग्णालयात जेनरिक औषधी उपलब्ध करणारनागपूर : देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते. ८० हजार टन खते विदेशातून आयात केली जातात. गेल्या काही महिन्यात खतांच्या भावात वाढ झालेली नाही. यापुढेही किमती वाढणार नसल्याची ग्वाही केंद्रीय उर्वरक व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात खतांचा तुटवडा नाही. जादा भावाने खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी. यासाठी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात जेनरिक औषधी उपलब्ध करण्यात येईल. महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणा आदी राज्यात वैद्यकीय उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहराची यासाठी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अद्यावत उपकरणे लावण्यात आलेली आहेत. कोल इंडिया लिमिटेडसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीला भाव मिळत नव्हता. परंतु या विरोधात आंदोलन उभारले. त्यामुळे ज्या २४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५० कोटी मिळणार होते. त्यात ३० ते ४० पट वाढ करून २६९० कोटी तसेच १० हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. १५ प्रकल्पात १४०० कोटींचा मोबदला व ४ हजार नोकऱ्या मिळाल्याची माहिती अहीर यांनी दिली. बल्लारपूर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव वाढवून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोकऱ्या स्पर्धात्मक देण्याच्या निर्णयानुसार देशात खनिज क्षेत्रातील मॉईलशिवाय इतर क्षेत्रात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. याला विरोध दर्शवून भूसंपादनाचा वाढीव भाव व वेकोलित १० हजारांवर नोकऱ्या मिळत आहे. कोळसा खाणीसाठी आता एकरी आठ लाख रुपये भाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. कोरपना व भद्रावती तालुक्यातील जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या आहेत. तसेच इतर भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार गिरीश व्यास, संदीप जाधव, किशोर पालांदूरकर व चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)