शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

खताच्या किमती वाढणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 02:48 IST

देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते.

हंसराज अहीर : शासकीय रुग्णालयात जेनरिक औषधी उपलब्ध करणारनागपूर : देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते. ८० हजार टन खते विदेशातून आयात केली जातात. गेल्या काही महिन्यात खतांच्या भावात वाढ झालेली नाही. यापुढेही किमती वाढणार नसल्याची ग्वाही केंद्रीय उर्वरक व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात खतांचा तुटवडा नाही. जादा भावाने खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी. यासाठी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात जेनरिक औषधी उपलब्ध करण्यात येईल. महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणा आदी राज्यात वैद्यकीय उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहराची यासाठी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अद्यावत उपकरणे लावण्यात आलेली आहेत. कोल इंडिया लिमिटेडसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीला भाव मिळत नव्हता. परंतु या विरोधात आंदोलन उभारले. त्यामुळे ज्या २४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५० कोटी मिळणार होते. त्यात ३० ते ४० पट वाढ करून २६९० कोटी तसेच १० हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. १५ प्रकल्पात १४०० कोटींचा मोबदला व ४ हजार नोकऱ्या मिळाल्याची माहिती अहीर यांनी दिली. बल्लारपूर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव वाढवून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोकऱ्या स्पर्धात्मक देण्याच्या निर्णयानुसार देशात खनिज क्षेत्रातील मॉईलशिवाय इतर क्षेत्रात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. याला विरोध दर्शवून भूसंपादनाचा वाढीव भाव व वेकोलित १० हजारांवर नोकऱ्या मिळत आहे. कोळसा खाणीसाठी आता एकरी आठ लाख रुपये भाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. कोरपना व भद्रावती तालुक्यातील जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या आहेत. तसेच इतर भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार गिरीश व्यास, संदीप जाधव, किशोर पालांदूरकर व चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)