शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:48 IST

फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे.

ठळक मुद्देनजरकैदेत असलेले सर्व जण मानवाधिकार कार्यकर्तेच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झाल्व्हीस यांना पुरेशा पुराव्याअभावी अटक करण्यात आली आहे. फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. मात्र आता व तेव्हादेखील या लोकांविरोधात ठोस पुरावे नव्हते. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.अगोदर अटक करण्यात आलेले व आता नजरकैदेत असलेले सर्व लोक हे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. देशात आपले विचार ठेवण्याचा व त्यांना मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. कुणाचे विचार तीव्र डावे किंवा तीव्र उजवे असू शकतात. या कार्यकर्त्यांवर झालेली कारवाई हा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष भटकविण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही निषेधच करतो, असे पी.चिदंबरम म्हणाले. जर एखाद्या व्यक्ती प्रत्यक्ष हिंसेत सहभागी नसेल किंवा हिंसेसाठी चिथावणीदेखील दिली नसेल, तर त्याच्यावर तशी कलमं लावण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.लोकशाहीच्या खच्चीकरणाचा प्रयत्नमागील चार वर्षांपासून देशात भयाचे वातावरण आहे. जर कुणी सरकारविरोधात बोलले तर थेट कारवाई करण्यात येते. लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे, असा आरोप पी.चिदंबरम यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम