शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:48 IST

फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे.

ठळक मुद्देनजरकैदेत असलेले सर्व जण मानवाधिकार कार्यकर्तेच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झाल्व्हीस यांना पुरेशा पुराव्याअभावी अटक करण्यात आली आहे. फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. मात्र आता व तेव्हादेखील या लोकांविरोधात ठोस पुरावे नव्हते. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.अगोदर अटक करण्यात आलेले व आता नजरकैदेत असलेले सर्व लोक हे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. देशात आपले विचार ठेवण्याचा व त्यांना मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. कुणाचे विचार तीव्र डावे किंवा तीव्र उजवे असू शकतात. या कार्यकर्त्यांवर झालेली कारवाई हा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष भटकविण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही निषेधच करतो, असे पी.चिदंबरम म्हणाले. जर एखाद्या व्यक्ती प्रत्यक्ष हिंसेत सहभागी नसेल किंवा हिंसेसाठी चिथावणीदेखील दिली नसेल, तर त्याच्यावर तशी कलमं लावण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.लोकशाहीच्या खच्चीकरणाचा प्रयत्नमागील चार वर्षांपासून देशात भयाचे वातावरण आहे. जर कुणी सरकारविरोधात बोलले तर थेट कारवाई करण्यात येते. लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे, असा आरोप पी.चिदंबरम यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम