शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप; साडेतीन टक्क्यांहून २३ टक्क्यांवर पोहोचली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 07:00 IST

Nagpur News ‘आयआयएम-नागपूर’मधील विद्यार्थिनींच्या अत्यल्प प्रमाणावरून विविध प्रश्न उपस्थित होत होते. मात्र मागील पाच वर्षांत विद्यार्थिनींच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे पाच वर्षांत आमूलाग्र सुधारणा

योगेश पांडे

नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मधील विद्यार्थिनींच्या अत्यल्प प्रमाणावरून विविध प्रश्न उपस्थित होत होते. मात्र मागील पाच वर्षांत विद्यार्थिनींच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. २०१७-१९ या बॅचच्या तुलनेत यंदाच्या बॅचमध्ये विद्यार्थिनींची टक्केवारी सहा पटींनी वाढली आहे. ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या धर्तीवर ‘आयआयएम-नागपूर’ने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ही वाढ दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘आयआयएम-नागपूर’ स्थापन झाल्यानंतर पहिले तीन वर्ष विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. २०१७-१९ च्या तिसऱ्या बॅचमध्ये विद्यार्थिनींची टक्केवारी ३.५१ टक्के इतकीच होती. एकूण ५७ प्रवेश असताना त्यात केवळ दोनच विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर २०१९-२१ या बॅचचा अपवाद सोडला तर सातत्याने विद्यार्थिनींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. ‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र, ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचेच प्रतिबिंब प्रवेशांमध्ये उमटले. २०२१-२३ या बॅचमध्ये २४५ प्रवेश झाले आहेत. यापैकी २३.२० टक्के विद्यार्थिनी आहेत.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा १७ महिन्यांचा सरासरी अनुभव

‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी ३४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २२.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २६.४० टक्के विद्यार्थ्यांना २ वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे. तर ३१.२० टक्के विद्यार्थ्यांना दोन वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा १७ महिने इतका आहे.

सात वर्षांत साडेचार पट प्रवेशवाढ

‘आयआयएम-नागपूर’ची स्थापना होऊन सात वर्ष पूर्ण झाले असून, नवीन कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी उद्घाटन होणार आहे. सात वर्षांत ‘आयआयएम’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे दिसून आले. २०१५-१७ या पहिल्याच बॅचमध्ये केवळ ५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. सात वर्षांत प्रवेशसंख्येत साडेचार पटींहून अधिक वाढ झाली असून, २०२१-२३ या विद्यमान बॅचमध्ये प्रवेश क्षमता वाढली असून २४५ प्रवेश झाले.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र