शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

एसटीपासून चार हात दूरच बरे; लाल परी की धारदार सुरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 15:37 IST

दोर आणि तार बांधून धावतात बसेस : बुलडाण्यातील अपघातापासून धडा घेण्याची गरज

नागपूर : तीन आठवड्यांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे तीन व्यक्ती गंभीर जखमी, तर दोघांचे हात खांद्यापासून वेगळे झाले होते. सर्वत्र दहशत निर्माण करणाऱ्या या अपघातानंतर एसटी महामंडळात आणि प्रवाशांतही चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, एसटीच्या नागपूर विभागाने बसेसच्या बाह्यदर्शनी भागाच्या देखरेखीवर नजर केंद्रित केली आहे. ज्या बसचे पत्रे उचकटले आहेत, अशा पत्र्यांना ठीक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यांचे जीवनच उद्ध्वस्त

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पिंपळगाव देवी दरम्यान मलकापूर आगाराच्या एसटी बसने तिघांना गंभीर जखमी केले होते. बसचा उचकटलेला धारदार पत्रा लागल्याने दोघांचे हात शरीरापासून वेगळे झाले होते. काहीही दोष नसताना १६ सप्टेंबरला झालेल्या या अपघातामुळे या बिचाऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.

अशी घटना पुन्हा घडायला नको

एसटी बसची योग्य ती देखभाल संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची किंमत त्या निर्दोष व्यक्तींना चुकवावी लागली. त्यामुळे पुन्हा असा अक्षम्य दुर्लक्षितपणा एसटी महामंडळाकडून होऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया वजा अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

‘लोकमत’ने काय पाहिले?

दोर आणि तार बांधून धावतात बस !

'लोकमत'ने या संबंधाने बसस्थानकाची पाहणी केली असता, काही बसचे पत्रे दोर आणि तार बांधून अर्थात जुजबी उपाययोजना करून धावत असल्याचे दिसून आले. गणेशपेठ बसस्थानकावर येणाऱ्या काही बसेसच्या कापलेल्या पत्र्यावर ठिगळ लावून असल्याचेही दिसून आले. बसेसची ही स्थिती चांगली नाही. प्रवासादरम्यान तो भाग तुटून खाली पडला तर अपघात घडू शकतो.

जखमा झाल्यास जबाबदार कोण ?

अनेक बसच्या पत्र्यांचा भाग उचकटलेला दिसतो. सीट जोडणाऱ्या अँगल किंवा बोल्टचे खुबेही बाहेर असतात. त्यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याची भीती असते. प्रवाशांना जखम झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न अमरावतीच्या उमा रमेश मेंढे यांनी विचारला आहे.

चालकांकडून होतो हलगर्जीपणा

अनेकदा बसचालक हलगर्जीपणा करतो. पुराचे पाणी पुलावर वाहत असताना बस दामटण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर ब्रेकर आणि खड्डा दिसत असूनही गती कमी करण्यापेक्षा बसचालक वेगात बस दामटतो. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना जखमा होतात, असे मयुर सांबरे (उमरेड) यांनी आपला अनुभव कथन करताना म्हटले आहे.

नागपूर विभागातील बस चांगल्या

बुलडाणा जिल्ह्यात झालेला अपघात दु:खद आहे. तो ध्यानात घेता सर्वच बसच्या बाह्य भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एक विशेष अधिकारीच नियुक्त करण्यात आला आहे. तुलनेत नागपूर विभागातील बसेसची स्थिती चांगली आहे. ज्या त्रुट्या आहेत, त्या दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

किशोर आदमने, प्रभारी विभाग नियंत्रक, एसटी, नागपूर

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर