शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Corona Virus in Nagpur; लॉकडाऊनची भीती वाटते साहेब; अंध विष्णूचा रोजगार थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:22 IST

अंधारलेल्या आयुष्यावर आाम्ही कधीचीच मात केली आहे. ४० वर्षाच्या प्रवासात कधीही इतक्या वेळ रेल्वे थांबली नाही आाणि आम्हीही थांबलो नाही. लॉकडाऊनने रेल्वे तर थांबविली अन् आमचे जगणेही थांबविले. लॉकडाऊनची भीती वाटते साहेब, अशी खंत अंध विष्णू डोंगरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकुटुंबीयांची होतेय उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधारलेल्या आयुष्यावर आाम्ही कधीचीच मात केली आहे. ४० वर्षाच्या प्रवासात कधीही इतक्या वेळ रेल्वे थांबली नाही आाणि आम्हीही थांबलो नाही. लॉकडाऊनने रेल्वे तर थांबविली अन् आमचे जगणेही थांबविले. लॉकडाऊनची भीती वाटते साहेब, अशी खंत अंध विष्णू डोंगरे यांनी व्यक्त केली.इंदिरानगर येथे राहणारे विष्णू डोंगरे ४० वर्षांपासून रेल्वेमध्ये प्रवाशांना उपयोगाच्या साहित्याची विक्री करतात. पत्नी आणि दोन मुलांच्या कुटुंबाला विष्णूचा मोठा हातभार होता. पत्नीही थोडीफार काम करायची. किरायाच्या घरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. पहाटे ४ वाजता विष्णू सामानाची भलीमोठी बॅग व हातात काठी घेऊन रेल्वेने बल्लारशापर्यंत प्रवास करायचे. यात ज्या काही साहित्याची विक्री व्हायची, त्यातून त्यांच्या कुटुंबीयाचे पोट भरायचे. पत्नीही लहान मुलांचे खेळाचे साहित्य तयार करून कुटुंबाला हातभार लावायची. पण २२ मार्चपासून सरकारने रेल्वे बंद केली आहे. विष्णू त्या दिवसपासून घरातच बसून आहे. पत्नीचेही काम लॉकडाऊनमुळे बंद पडले आहे. हातातला पैसा संपतो आहे आणि लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा आहे. ही एकट्या विष्णूची कहाणी नाही, विष्णूसारखे अनेक अंध आहेत, जे रेल्वेत साहित्याची विक्री करतात. अनेक अंध आहेत, जे छोटा-मोठा रोजगार करून पोटाची खळगी भरतात. रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठेमध्ये काहीतरी विक्री करणारे हे अंधबांधव लॉकडाऊननंतर बाहेरच पडलेले नाही. रस्त्यावर सुरू असलेले अन्नधान्य वाटप त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. शहरात संचारबंदीमुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. अशात जीव दोन घासासाठी तडफडतो आहे. या अंधांबरोबरच त्यांचे चिल्लेपिल्लेही आहेत. वस्त्यावस्त्यांमध्ये हे लोक मिळतात. फक्त शोधून त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस