शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मृत्यूच्या भीतीने प्रबोधन थांबविणार नाही

By admin | Updated: May 27, 2017 02:58 IST

मुंबईत कशामुळे हल्ला झाला हे माहिती नाही, पण मृत्यूच्या भीतीने कधीच प्रबोधन कार्य थांबविणार नाही

सत्यपाल महाराजांचे प्रत्युत्तर : हल्लेखोर तरुणाला क्षमा केली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईत कशामुळे हल्ला झाला हे माहिती नाही, पण मृत्यूच्या भीतीने कधीच प्रबोधन कार्य थांबविणार नाही असे चोख प्रत्युत्तर राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी विरोधकांना दिले. चाकू हल्ल्यानंतर ते शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधला. १२ मे रोजी नायगाव, मुंबई येथे कुणाल जाधव नामक तरुणाने महाराजांच्या पोटात चाकू भोसकला होता. त्यातून महाराज सुदैवाने बचावले. पत्नीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जीवन समाज प्रबोधनाला समर्पित केले. प्रबोधन सोडल्यास जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे प्रबोधन करताना येणाऱ्या मृत्यूसाठी मी सज्ज आहे अशी बेडर भूमिका महाराजांनी मांडली. हल्ला करणारा तरुण समाज प्रबोधनाच्या विरोधात असावा. त्यामुळे त्याने हल्ला केला असावा असा अंदाज महाराजांनी व्यक्त केला. त्या तरुणाने हल्ला करण्याचे कारण सांगितले नाही. परिणामी आपण कुठे चुकलो हे कळले नसल्याने दु:ख वाटते असे महाराज म्हणाले. त्या तरुणाला कठोर शिक्षा व्हावी असे वाटत नसून त्याला क्षमा केल्याचे महाराजांनी सांगितले. या हल्ल्यामागील मास्टरमाईन्ड नक्कीच मनुवादी व कर्मकांडी आहे. तो कोण आहे हे चौकशीतून पुढे येईल असे मत महाराजांनी कोणावरही आरोप करण्याचे टाळून व्यक्त केले. त्या मुलीच्या धाडसाचे स्वागत अलीकडेच एका मुलीने लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू साधूचे लिंग चाकूने कापले. त्या मुलीच्या धाडसाचे महाराजांनी स्वागत केले. संबंधित साधू पीडित मुलगी व त्या मुलीच्या आईचे अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण करीत होता. अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलीने साधूचे लिंग कापले. महाराजांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी सर्वांना टाळ्या वाजवायला लावल्या. हल्ल्यावर चिंतन बैठक समाज प्रबोधनकारांवर भविष्यामध्ये असे हल्ले होऊ नये यावर चिंतन करण्यासाठी सुभाष रोडवरील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. बैठकीत सत्यपाल महाराजांसह श्री गुरुदेव सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मुस्लीम मराठी साहित्य परिषद, बुद्ध धर्म संस्कार केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुद्धविहार समन्वय समिती, ग्राम संरक्षण दल, सर्वोदय मंडळ इत्यादी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सत्यपाल महाराज हल्ला निषेध समितीही स्थापन केली आहे.