शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या भीतीने प्रबोधन थांबविणार नाही

By admin | Updated: May 27, 2017 02:58 IST

मुंबईत कशामुळे हल्ला झाला हे माहिती नाही, पण मृत्यूच्या भीतीने कधीच प्रबोधन कार्य थांबविणार नाही

सत्यपाल महाराजांचे प्रत्युत्तर : हल्लेखोर तरुणाला क्षमा केली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईत कशामुळे हल्ला झाला हे माहिती नाही, पण मृत्यूच्या भीतीने कधीच प्रबोधन कार्य थांबविणार नाही असे चोख प्रत्युत्तर राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी विरोधकांना दिले. चाकू हल्ल्यानंतर ते शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधला. १२ मे रोजी नायगाव, मुंबई येथे कुणाल जाधव नामक तरुणाने महाराजांच्या पोटात चाकू भोसकला होता. त्यातून महाराज सुदैवाने बचावले. पत्नीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जीवन समाज प्रबोधनाला समर्पित केले. प्रबोधन सोडल्यास जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे प्रबोधन करताना येणाऱ्या मृत्यूसाठी मी सज्ज आहे अशी बेडर भूमिका महाराजांनी मांडली. हल्ला करणारा तरुण समाज प्रबोधनाच्या विरोधात असावा. त्यामुळे त्याने हल्ला केला असावा असा अंदाज महाराजांनी व्यक्त केला. त्या तरुणाने हल्ला करण्याचे कारण सांगितले नाही. परिणामी आपण कुठे चुकलो हे कळले नसल्याने दु:ख वाटते असे महाराज म्हणाले. त्या तरुणाला कठोर शिक्षा व्हावी असे वाटत नसून त्याला क्षमा केल्याचे महाराजांनी सांगितले. या हल्ल्यामागील मास्टरमाईन्ड नक्कीच मनुवादी व कर्मकांडी आहे. तो कोण आहे हे चौकशीतून पुढे येईल असे मत महाराजांनी कोणावरही आरोप करण्याचे टाळून व्यक्त केले. त्या मुलीच्या धाडसाचे स्वागत अलीकडेच एका मुलीने लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू साधूचे लिंग चाकूने कापले. त्या मुलीच्या धाडसाचे महाराजांनी स्वागत केले. संबंधित साधू पीडित मुलगी व त्या मुलीच्या आईचे अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण करीत होता. अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलीने साधूचे लिंग कापले. महाराजांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी सर्वांना टाळ्या वाजवायला लावल्या. हल्ल्यावर चिंतन बैठक समाज प्रबोधनकारांवर भविष्यामध्ये असे हल्ले होऊ नये यावर चिंतन करण्यासाठी सुभाष रोडवरील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. बैठकीत सत्यपाल महाराजांसह श्री गुरुदेव सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मुस्लीम मराठी साहित्य परिषद, बुद्ध धर्म संस्कार केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुद्धविहार समन्वय समिती, ग्राम संरक्षण दल, सर्वोदय मंडळ इत्यादी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सत्यपाल महाराज हल्ला निषेध समितीही स्थापन केली आहे.