शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
5
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
7
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
8
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
9
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
10
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
11
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
12
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
13
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
14
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
15
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
16
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
17
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
18
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
19
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
20
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खाद्यान्नावर ‘एफडीए’ची नजर

By admin | Updated: August 4, 2015 03:28 IST

सणासुदीत भेसळखोर सक्रिय झाले आहेत तर दुसरीकडे भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) विभागाने

नागपूर : सणासुदीत भेसळखोर सक्रिय झाले आहेत तर दुसरीकडे भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) विभागाने कंबर कसली आहे. भेसळयुक्त खाद्यान्न विक्रेत्यांवर विभागाची करडी नजर असून अधिकाऱ्यांनी आतापासूनच विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.खाद्यान्नातील भेसळ लोकांना ओळखता येत नाही. त्याचाच फायदा भेसळखोरांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धावपळीच्या जीवनात बरेचजण हॉटेलमधून मिठाई किंवा दुकान वा मॉलमधून पॅकबंद पक्वान्न विकत आणतात. खरेदी केलेले पक्वान्न भेसळयुक्त तर नाही ना, यावर नेहमीच संशय व्यक्त केला जातो. पण त्यावर बोलण्यास कुणीही धजावत नाहीत. त्याचाच फायदा घेत भेसळखोर जास्त सक्रिय होतात. नफा कमविण्यासाठी जनतेच्या आरोग्याशी खेळण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. खव्याचे पदार्थ म्हटले की, भेसळीची आयतीच संधी मिळते. तपासणीदरम्यान भेसळ आढळल्यास अधिकारी तात्काळ कारवाई करणार असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.आर. वाकोडे यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘एफडीए’चे अधिकारी सक्रिय४भेसळ करताना आढळून आलेल्या दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी असो वा उपवासादरम्यान रंगीबेरंगी मोदक दुकानातून पहायला मिळतात. पण तो रंग प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न विभागाने खाद्यपदार्थांमध्ये ठराविक मर्यादेपर्यंत काही रंग वापरण्यास परवानगी दिली आहे. पण आज अनेक दुकानातून अत्यंत गडद रंगातील मोदक तसेच इतर मिठाई पहायला मिळते. चांदीच्या वर्खाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हा फरक वरवर दिसणारा असला तरी मिठाईच्या आतला फरक डोळ्यांना जाणवत नाही. चक्क बनावट खवा तयार करण्यापर्यंत भेसळखोरांची मजल गेली आहे. भेसळखोर भेसळयुक्त खवा विकून आपली पोळी भाजून घेतात. मात्र त्यामुळे होणाऱ्या परिणामांना ग्राहकांना सामोरे जावे लागते.नोंदणी, परवान्याचा फलक बंधनकारक४दुकानाची नोंदणी किंवा परवाना घेतल्याचा फलक ‘९ बाय ६ फूट’ या आकारामध्ये लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.भेसळयुक्त पदार्थांमुळे पोटाचा त्रास४भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने काही वेळा पोटाचा त्रास जाणवतो. तर त्यामुळे आरोग्यावर काही दीर्र्घ परिणामही होतात. या गंभीर बाबी लक्षात घेता विभागाची तपासणी मोहीम सुरू असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. परराज्यातून येणाऱ्या खव्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भेसळीची शंका आल्याने ग्राहकांनी थेट अन्न प्रशासन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन वाकोडे यांनी लोकमतशी बोलताना केले. खव्याच्या पदार्थांचे २४ तासात सेवन करा४खव्याचे पदार्थ खरेदी केल्यापासून २४ तासांमध्ये, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांमध्ये खावी, असे बॉक्सवर नमूद करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मिठाई हाताळण्यासाठी प्लॅस्टिकचे हातमोजे आणि डोक्यावर प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याच्या सूचना सर्व मिठाई विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)