शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

तरुण मुलापाठाेपाठ वडिलांचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : नऊ महिन्यांपूर्वी एकुलत्या एक तरुण मुलाने केलेल्या आत्महत्येचे दु:ख आणि वाढते कर्जबाजारीपण यामुळे सतत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : नऊ महिन्यांपूर्वी एकुलत्या एक तरुण मुलाने केलेल्या आत्महत्येचे दु:ख आणि वाढते कर्जबाजारीपण यामुळे सतत चिंतित असलेल्या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुसुंद्री येथे बुधवारी (दि. १४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

चंद्रशेखर काळे, रा. सुसुंद्री, ता. कळमेश्वर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रशेखर यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. सततची नापिकी आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे ते चिंतित हाेते. त्यातच त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी त्यांच्या थाेरल्या मुलीचे लग्न केले. त्यासाठी त्यांना नातेवाईक व इतरांकडून उसनी रक्कम घ्यावी लागली हाेती. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांना समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे त्यांना कर्जपरतफेडीची चिंता भेडसावत हाेती. तरुण मुलाचा आधार गेल्याने त्यांचे मनाेधैर्य खचले हाेते.

दरम्यान, ते बुधवारी सकाळी शेतात गेले. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, ते शेतात बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे यांनी पाेलिसांना सूचना दिली व चंद्रशेखर यांना कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित व एक अविवाहित अशा दाेन मुली आहेत. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

...

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्या

चंद्रशेखर काळे यांना गाैरव (२१) हा एकुलता एक मुलगा हाेता. त्यांनी त्यांच्या थाेरल्या मुलीचे नऊ महिन्यांपूर्वी लग्न केले. त्यासाठी मित्र व इतरांकडून कर्जही घेतले हाेते. बहिणीचे लग्न आटाेपल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाैरवने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तरुण मुलगा अचानक गेल्याने त्यांचे मनाेधैर्य खचले हाेते. वाढते कर्जबाजारपण आणि धाकट्या मुलीच्या लग्नाची चिंताही त्यांना भेडसावत हाेती. गाैरव गेल्यापासून ते सतत चिंतित असायचे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

...

शेती विकायला काढली

चंद्रशेखर यांनी बँक व इतरांकडून कर्ज घेतले हाेते. मात्र, त्यांनी कुणाकडून किती कर्ज घेतले हाेते, याची माहिती मिळू शकली नाही. या कर्जाची परतफेड करणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी काही शेती विकायला काढली हाेती. ग्राहक न मिळाल्याने त्यांना ती विकणेही शक्य झाले नाही. ‘तुम्ही असे करायला नकाे हाेते. माझा नव्हे तर निदान मुलीचा तरी विचार करायला हवा हाेता’, असे म्हणत त्यांच्या पत्नीने हंबरडा फाेडला हाेता. घरातील पुरुष माणसं गेल्याने काळे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.